साहित्य : 12 पनीरचे चौकोनी तुकडे, 2 चमचे तेल, 2 चमचे काजू, 1 चमचा बटर, 1 तमालपत्र, 3 लवंग, 2 वेलची, 1 चमचा जिरं, 1 कांदा बारीक चिरून, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट पावडर, 1 चमचा धणे-जिरेपूड, पाव चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा मीठ, 1 वाटी टोमॅटो प्युरी, 2 चमचे काजू पेस्ट, 2 चमचे क्रीम, पाव वाटी पाणी, 1 चमचा कसुरीमेथी, 2 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : गरम तेलात पनीर हलक्या सोनेरी रंगावर परतवावेत. त्याच तेलात काजू परतवावेत. त्यातच बटर गरम करून त्यात तमालपत्र, लवंग, वेलची आणि जिरं टाकावे. नंतर कांदा आणि आलं-लसूण पेस्ट टाकून गुलाबी रंगावर परतवावे. आच मंद करून त्यात हळद, लाल तिखट, धणे-जिरेपूड, गरम मसाला पावडर आणि मीठ टाकून मिक्स करावे. आता टोमॅटो प्युरी मिक्स करून मिश्रण शिजवून घ्यावे. नंतर त्यात काजू पेस्ट टाकावी. नंतर क्रीम टाकून मिश्रण शिजवावे. आता पाणी ओतावे. शेवटी पनीर मिक्स करून मिश्रण तीन मिनिटे शिजवावे. आता कसुरीमेथी आणि कोथिंबीर टाकून नानसोबत खाण्यास द्या.