राज्य शासनाकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर : महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना होणार
दर पाच वर्षांनी होणार वृक्ष गनना : पुनर्रोपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली : हेरिटेज वृक्ष तोडल्यास होणार दंड
प्रतिनिधी / मालवण:
राज्य शासनाने वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियमात दुरुस्ती करीत राज्यातील 50 वर्षांवरील वृक्षांची गणना हेरिटेज ट्री (प्राचीन वृक्ष) म्हणून करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाचीही स्थापना करण्यात येणार आहे. हेरिटेज ट्रीमध्ये कोणत्या झाडांचा समावेश असेल, याबाबत अद्याप स्पष्टता करण्यात आली नसली, तरी प्राधिकरणाची नियुक्ती झाल्यानंतर याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, 1975 मध्ये महत्वाच्या तरतुदी करण्याच्या दृष्टीने, अधिनियमामध्ये सुधारणांचा अंतर्भाव करून त्याचे अधिनियमात रुपांतरीत करण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता स्थानिक वृक्ष प्राधिकरणांनी त्यांच्यास्तरावर प्रकरणे मंजूर करताना महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम, 1975 मधील प्रस्तावित सुधारणांच्या अधीन राहून मंजुरी देण्यात यावी. राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याने, महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणांच्या कक्षेत येणारे प्रस्ताव त्यांच्याकडे सोपविण्यासाठी तयार ठेवावेत, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
करण्यात आलेल्या सुधारणा
50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृक्ष हे हेरिटेज ट्री (प्राचीन वृक्ष) म्हणून परिभाषित केले जातील. हे वृक्ष विशिष्ट प्रजातींचे असू शकतील. अशा प्रजाती वेळोवेळी अधिसूचित करण्यात येतील. वृक्षाचे वय ठरविण्यासाठी वन विभागाकडे सध्या असलेल्या प्रचलित पद्धतीबद्दल त्यांच्याशी सल्लामसलत करून पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मार्गदर्शक सूचना जारी करेल. वृक्षांना हेरिटेज ट्री दर्जा देण्यासाठी व भरपाई वृक्षारोपणांतर्गत लागवड करायच्या झाडांची संख्या निश्चित करण्यासाठी वृक्षाचे वय हा एक महत्वाचा पैलू आहे. तोडल्या जाणाऱया वृक्षांच्या वयाच्या संख्येएवढी नवीन झाडे भरपाई वृक्षारोपण म्हणून लावण्यात यावीत. लागवड करताना किमान सहा ते आठ फूट उंचीची रोपे लावण्यात यावीत. हे वृक्षारोपण त्याच ठिकाणी केले जावे. जागा उपलब्ध नसल्यास हे वृक्षारोपण सार्वजनिक जमिनीवर केले जाऊ शकते. अशा प्रकारे लावण्यात येणाऱया वृक्षांचे जिओ टॅगिंग करून सात वर्षांपर्यत संगोपन करणे आवश्यक राहील. नुकसान भरपाई म्हणून वृक्ष लागवड करणे शक्मय नसेल, तर तोडल्या जाणाऱया वृक्षांच्या मूल्यांकनापेक्षा कमी नसेल एवढी रक्कम अर्जदार जमा करू शकतात. पाच वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची 200 हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठविला जाईल. महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाने झाडे तोडण्याची शिफारस जरी केली तरी, स्थानिक वृक्ष प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणास त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करू शकतील. स्थानिक वृक्ष प्राधिकरणाने याची खात्री करून घ्यावी की, वृक्षांची संख्या निश्चित केलेल्या मर्यादेत ठेवण्यासाठी प्रकल्पांचे लहान लहान भागात विभाजन केले जाणार नाही, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
प्राधिकरण ठेवणार लक्ष
महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. वृक्षांच्या संरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्यस्तरावर एक वैधानिक प्राधिकरण स्थापन केले जाईल. हे प्राधिकरण स्थानिक वृक्ष प्राधिकरणाच्या कामकाजावर वेळोवेळी लक्ष ठेवणे, राज्यभरातील हेरिटेज वृक्षांचे संरक्षण व संवर्धन, हेरिटेज वृक्ष तोडीसाठीच्या अर्जाची सुनावणी, पाच वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची 200 हून अधिक झाडे तोडण्याच्या अर्जाची सुनावणी, संरक्षण आणि वृक्ष संवर्धनाशी संबंधित इतर कोणतेही कार्य करणार आहे.
पाच वर्षांनी होणार वृक्षांची गणना
दर पाच वर्षांनी वृक्षांची गणना केली जाते, याची खात्री करण्यात येणार आहे. हेरिटेज वृक्षांची गणना आणि संवर्धन स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड आणि त्यांचे जतन केले जाणार आहे. नागरी स्थानिक प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील सर्व भूमीवरील वृक्षांचे अस्तित्व सुनिश्चित करणे व शहरी स्थानिक प्राधिकरणाच्या किंवा सरकारी मालकीच्या जमिनीवर वृक्षारोपण केले जाईल, हे सुनिश्चित करण्यात येणर आहे. वृक्षारोपण वैज्ञानिक पद्धतीने, स्थानिक प्रजातींच्या संरक्षणाच्या दृष्टीने व वृक्षारोपणांतर्गत क्षेत्र हे किमान 33 टक्के असेल, या उद्देशाने केले जाईल. वृक्षांची देखभाल व छाटणी (pruning) शास्त्राsक्त पद्धतीने आणि तज्ञांच्या मार्गदर्शनावर केली जाते, हे सुनिश्चित करणे. नुकसान भरपाईसाठीची लागवड व त्याचे संगोपन सुनिश्चित करणे. वृक्ष उपकराचा उपयोग वृक्षांच्या संवर्धनासाठी लक्ष देण्यात येणार आहे. पुनर्रोपण करण्यात येणाऱया वृक्षाच्या अंदाजे वयाइतके वृक्षारोपण भरपाई म्हणून करावे. हेरिटेज ट्री तोडण्यास आल्यास प्रति वृक्षास जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत मर्यादित राहील, असेही शासनाने म्हटले आहे.