चिपळूण
पारंपरिक भात लागवडीला फाटा देत तालुक्यात यंदा नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे 135 शेतकऱयांनी लाल व काळय़ा भाताची लागवड केली आहे. या लागवडीसाठी प्रात्यक्षिक व उत्पादित भातबियाण्यांचे पुढील क्षेत्र विस्तारासाठी नियोजन कृषी विभागाने केले आहे.
कोकणात वर्षानुवर्षे पारंपरिक भात बियाण्याची लागवड केली जात आहे. नाचणी, वरी तसेच इतक कडधान्यासही हीच पारंपरिक पध्दत अवलंबल्याने शेतकऱयांचा आर्थिक फायदा होत नसल्याचे लक्षात येत आहे. यासाठी शेतकऱयांनी लाल तसेच काळ्या भाताची लागवड करण्याचा तालुक्यात पहिला प्रयोग हाती घेतला आहे. त्यासाठी तालुक्यातील शेतकऱयांना 250 किलो लाल तर 100 किलो काळ्या भात बियाणाचे लोकहिस्सा तत्वावर कृषी विभागामार्फत वाटप करण्यात आले आहे. लाल भाताची 110 शेतकऱयांनी 25 तर काळय़ा भाताची 43 शेतकऱयांनी 5 हेक्टरवर लागवड केली आहे. यातून अधिकाधिक उत्पादन निघणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले असून या भातापैकी 50 टक्के भात बियाण्याचा पुढील क्षेत्र विस्तारासाठी वापर करण्यात येणार आहे.