प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी सकाळी 11 च्या दरम्यान शहर व परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले. सकाळी उघडीप होती. मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
गेल्या आठवडाभरापासून परतीचा पाऊस अधूनमधून सुरूच असल्याने खरीप हंगामातील पिकांना धोका निर्माण झाला आहे. या पावसामुळे दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण होऊन हवेत गारठा निर्माण झाला.
शहर परिसरात बुधवारी झालेल्या पावसामुळे बाजारात आलेल्या ग्राहकांसह क्यापारीवर्गाची तारांबळ उडाली. काही भागात नागरिकांची वर्दळ कमी झालेली पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना आडोसा घ्यावा लागला. शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसाने सखल भागात पाणीच पाणी होऊन काही ठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली होती.
तालुक्मयातही पाऊस होत असल्याने शिवारात पाणीच पाणी होऊन पिके धोक्मयात आली आहेत. आधीच जुलै महिन्यात झालेल्या अतिपावसाचा फटका पिकांना बसला होता. त्यातच सध्या परतीचा पाऊस सातत्याने सुरू असल्याने हातातोंडाला आलेली पिके वाया जाण्याची भीती क्यक्त होत आहे.
खरीप हंगामातील भात पिकांसह बटाटा, रताळी व भुईमूग पिकांना फटका बसला आहे. त्याबरोबरच सतत पाऊस सुरू असल्याने बटाटा, रताळी व भुईमूग काढणीदेखील लांबणीवर पडली आहे.
त्यामुळे बळीराजा उघडीपीच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्मयातील बहुतांशी भागातील भात पीक पोसवणीच्या अवस्थेत आहे. अशावेळी मोठा पाऊस झाल्यास भात पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.