प्रतिनिधी / सातारा :
कोरोना व्हायरस मुळे उद्भवलेल्या लोकडाऊन मध्ये सातारा जिह्यात दुस्रया राज्यातील अनेक नागरिक, मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक अडकलेले आहेत.
भाजप सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सतायातून सर्व परप्रांतीयांसाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. प्रशासनाने ती मागणी मान्य करून मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे रेल्वे सोडण्याची तयारी केली.प्रशासनाने नियोजन करून मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता सातारा येथून मध्यप्रदेश येथील रिवा पर्यंत विशेष रेल्वे सोडली.मध्यप्रदेश मधील नागरिकांनी आनंदाने या रेल्वे ने प्रवासास सुरवात केली.या वेळी मध्यप्रदेश मधील नागरिकांना प्रवासाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे, विट्ठल बलशेटवार, युवा मोर्च्या अध्यक्ष विक्रम बोराटे, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. वीरेंद्र घडय़ाळे , नगरसेवक अविनाश कदम, वैभव पंडित , युवा मोर्च्या उपाध्यक्ष तेजस काकडे उपस्थित होते. या वेळी 500 मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी प्रवाशांनी “भारत माता की जय ” , आणि ” जय श्रीराम” च्या घोषणा दिल्या.