बेळगाव :/ प्रतिनिधी
परराज्यात असणाऱया नागरिकांना आपापल्या मूळ गावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गावो-गावी परतणाऱयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींची सर्व जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतींकडे आहे. मात्र काही ग्राम पंचायतींचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परराज्यातून आलेल्यांना सीपीएड मैदानापासून पायी चालत गाव गाठावे लागत आहे. यामुळे नाराजी क्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये 188 जण क्वारंटाईन असून त्यामध्ये 114 जण पुरुष तर 74 महिलांचा समावेश आहे. कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असून खबरदारी म्हणून परराज्यांतून आलेल्यांना शाळा, समुदाय भवन, मंदिरांमध्ये 14 दिवस क्वांरटाईन व्हावे लागणार आहे. या काळात क्वारंटाईन व्यक्तींना जेवण, पाणी, शौचालय यासह इतर सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबंधित ग्राम पंचायतींवर आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींनी याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे.
गेल्या दोन-चार दिवसांपासून तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे यासह इतर ठिकाणांहून येणाऱयांची संख्या वाढत आहे. अशा व्यक्तींची पहिल्यांदा सीपीएड मैदानावर तपासणी करून क्वारंटाईनसाठी परवानगी दिली जात आहे. मात्र क्वारंटाईन व्यक्तींना सीपीएडपासून गावापर्यंत येण्याची जबाबदारी ग्राम पंचायतींची आहे. मात्र काही ग्राम पंचायतींनी याकडे कानाडोळा केला आहेत. त्यामुळे परराज्यांतून गावी परतणाऱयांना पायी चालत गाव गाठण्याची वेळ येत आहे.
ग्रामीण भागातील जनता धास्तावली
ग्रामीण भागातील जनता कोरोना संकटामुळे धास्तावली आहे. त्यातच आता गावो-गावी क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची संख्या वाढत आहे. परराज्यांतून आलेले काही जण आल्या आल्या आपल्या घरी जात आहेत. तर काही जण विनाकारण क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींना भेटायला जात आहेत. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व गोष्टीवर नजर ठेवण्यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.
तालुक्मयातील हंदिगनूर, बोडकेनहट्टी, कुरीहाळ, चलवेनहट्टी, बेकिनकेरे, अतिवाड, येळ्ळूर, उचगाव, कडोली, गुंजेनहट्टी, बस्तवाड, बागेवाडी, संतिबस्तवाड, काकती, निलजी, बेनकनहळळी, कुदेमनी, कंग्राळी बी. के, पिरनवाडी, सांबरा, तुरमुरी आदी गावांमध्ये परराज्यांतून व्यक्ती आले आहेत. त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्याबरोबर दोन-चार दिवसांत बाहेरून येणाऱयांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींनी सावध रहाणे गरजेचे आहे.
‘सेवा सिंधू’ ऍपद्वारे ऑनलाईन परवानगी घेऊन परराज्यांतून नागरिक आपल्या मूळ गावी परतत आहेत. ग्राम पंचायतींना बाहेरून आलेल्यांची माहिती देण्यासाठी क्वारंटाईन वॉच ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारे ग्राम पंचायत पीडीओंना माहिती दिली जात आहे.