बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील चार परिवहन महामंडळातील कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, ज्यामध्ये समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या समितीचे अध्यक्ष कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळ (केएसआरटीसी) शिवयोगी कळसद असतील. तर बेंगळूर महानगर परिवर्तन निगमचे (बीएमटीसी) व्यवस्थापकीय संचालक, ईशान्य व उत्तर-पश्चिम रस्ता परिवहन महामंडळ हे सदस्य असतील. केएसआरटीसीचे संचालक (कर्मचारी आणि पर्यावरण) हे सदस्य सचिव असतील. समिती कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्याशी संबंधित सरकारला सूचना किंवा प्रस्ताव देईल.
समिती अहवालासह आरोग्य व्यवस्था, विमा योजना, महामंडळातील कर्मचार्यांचे हस्तांतरण, प्रशासन यंत्रणा व अन्य मागण्यांसह चर्चा करेल व सरकारला प्रस्ताव देईल. चार परिवहन महामंडळातील कर्मचार्यांच्या संपाच्या वेळी बळजबरीने बस थांबवून हल्ल्याच्या आरोपावरून राज्यात एकूण ६० कर्मचार्यांना अटक करण्यात आली. या कर्मचार्यांच्या कुटुंबीयांनी परिवहनमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांची सुटका करण्याची विनंती केली. कर्मचार्यांना लवकरच सोडण्यात येईल, असे आश्वासन मंत्र्यांनी दिले.