बेळगाव/प्रतिनिधी :
लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने मेच्या शेवटच्या आठवडय़ापासून राज्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. मात्र, बससेवा सुरू झाल्यापासून अद्याप प्रवाशांचा प्रतिसाद थंडावलेलाच आहे. त्यामुळे बेळगाव विभागाला दररोज 70 लाखांचा फटका बसत आहे. सध्या बेळगाव मध्यवर्ती बसस्थाकातून दररोज 300 ते 400 बस धावत असल्या तरी प्रवाशांची संख्या चांगलीच घटली आहे. त्यामुळे परिवहन तोटय़ात… बससेवा सुरूच अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
लॉकडाऊनमध्ये परिवहनच्या स्थानिक बसेससह लांब पल्ल्याच्या सर्व बसेस सलग दोन महिने बंद होत्या. त्यामुळे परिवहनचा महसूल पूर्णपणे ठप्प झाला होता. परिवहन मंडळाच्या कर्मचाऱयांचे एप्रिल महिन्याचे वेतन राज्य शासनाने दिले होते. बससेवा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप प्रवाशांची संख्या रोडावलेलीच आहे. त्यामुळे आता मे महिन्याच्या वेतनाविषयी परिवहन व राज्य सरकार कोणता निर्णय घेणार याकडे कर्मचाऱयांचे लक्ष लागले आहे. सध्या शहरातील अनगोळ, वडगाव, शाहूनगर यासह ग्रामीण भागातील के. के. कोप्प, कट्टणभावी, कुदेमनी, काकती, तीर्थकुंडये, बसरीकट्टी, सुळेभावी, मुचंडी, हलगा-बस्तवाड, मास्तमर्डी, चंदनहोसूर, जानेवाडी, संतिबस्तवाड, खादरवाडी, कर्ले आदी ठिकाणी बस धावत असल्या तरी प्रवाशांची संख्या फारच थंडावलेली पाहायला मिळत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करूनच बस स्थानकात प्रवेश दिला जात आहे. प्रवाशांसह बसचे चालक आणि वाहकांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे. निर्जंतुकीकरण करूनच बसेस प्रवासासाठी वापरण्यात येत आहेत. प्रवास सुरक्षित क्हावा, कोणालाही धोका होऊ नये, यासाठी एका बसमध्ये प्रवासी संख्या 30 करण्यात आली असली तरी प्रवाशांची संख्या फारच रोडावली आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून गोवा, संकेश्वर, निपाणी, चिकोडी, हुबळी, धारवाड, बैलहोंगल आदी ठिकाणी प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र, कोरोनाच्या धास्तीने प्रवाशांनी बुकिंगकडेही पाठ फिरविल्याने बुकिंग खिडकी मोकळी दिसत आहे. त्यामुळे परिवहनला फटका बसत आहे. त्याचबरोबर शाळाही बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्दळही