राजनाथ सिंग यांनी चीनला ठणकावले : रशियात भारत-चीन संरक्षण मंत्र्यांमध्ये दीर्घ चर्चा
मॉस्को / वृत्तसंस्था
रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये झालेल्या भारत-चीन संरक्षण मंत्री स्तरावरील चर्चेदरम्यान राजनाथ सिंग यांनी शनिवारी चीनला पुन्हा एकदा कडक शब्दात ठणकावले. सीमेवरील परिस्थिती वारंवार बिघडवण्याचा प्रयत्न न करता परिस्थितीचे योग्य भान राखा, अशी समजच भारतीय संरक्षणमंत्र्यांनी चीनला दिली आहे. भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण असताना, रशियामध्ये केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि चीनचे संरक्षणमंत्री जनरल वुई फेंगे यांच्यात शुक्रवारी रात्री उशिराने द्विपक्षीय चर्चा झाली. तब्बल सव्वा दोन तास ही बैठक सुरू होती, अशी माहिती भारतीय अधिकाऱयांकडून शनिवारी देण्यात आली. पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झालेल्या ठिकाणी आधी होती तशी, ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण करा, असे राजनाथ सिंग यांनी बैठकीत स्पष्ट केले.
लडाख भागात उभय देशांदरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाल्यानंतर, दोन्ही देशांच्या वरि÷ नेत्यांमध्ये पहिल्यांदाच रशियामध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये सुरू असलेल्या या बैठकीत संरक्षण सचिव अजय कुमार आणि रशियातील भारतीय राजदूत डी. बी. व्यंकटेश वर्मा देखील सहभागी झाले होते. पूर्व लडाख सीमेवर निर्माण झालेल्या अभूतपूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुक्रवारी रात्री मॉस्कोमध्ये चीनचे संरक्षणमंत्री जनरल वुई फेंगे ही यांची भेट घेतली. रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. जवळपास दोन तासापेक्षा जास्त वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा चालली होती.
मंत्रीस्तरीय प्रथमच आमने-सामने चर्चा
शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी राजनाथ सिंग रशियाला गेले आहेत. चीनचे संरक्षणमंत्री सुद्धा या परिषदेसाठी तेथे आले आहेत. चीनकडून या बैठकीची मागणी करण्यात आली होती. मे महिन्यात लडाखमध्ये सुरू झालेल्या सीमावादानंतर प्रथमच दोन्ही देशाच्या नेत्यांमध्ये झालेली ही पहिली उच्चस्तरीय बैठक होती. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही चर्चा होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्व लडाखमध्ये सीमा वाद वाढल्यानंतर उभय देशांमधील ही पहिली उच्चस्तरीय बैठक आहे.
जवळपास अडीच तास खलबते
जवळपास दोन तासापेक्षा जास्तवेळ चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घकाळ सुरू असलेल्या सीमावादावर तोडगा काढण्याचे काय मार्ग आहेत, त्यावर प्रामुख्याने चर्चा झाली. या बैठकीआधी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्याशीही संवाद साधल्याचे समजते. 29-30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱयाजवळ चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर शुक्रवारच्या बैठकीत भारताच्या शिष्टमंडळाने चीनकडे आक्षेप नोंदवला अशी माहिती सूत्रांनी दिली.
रशियात प्रत्येक टप्प्यावर भारताची वाहवा
रशियामध्ये प्रत्येक व्यासपीठावर चिनी संरक्षणमंत्री जनरल वुई फेंगेपेक्षा राजनाथ सिंग यांच्यावर अधिक लक्ष लागले आहे. ज्या प्रकारे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे स्वागत केले गेले, त्यामुळे स्पष्ट झाले की, रशियाने चीनपेक्षा भारताच्या मैत्रीला अधिक महत्त्व दिले. रशियामध्ये सर्वत्र चिनी संरक्षणमंत्री जनरल वुई फेंगे भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या पाठोपाठ चालताना पाहिले गेले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि चीनचे संरक्षण मंत्री जनरल वुई फेंगे एकत्र रशियन सैन्याच्या स्मारकात पुष्प अर्पण करण्यासाठी आले असता, रशियन लष्करी अधिकाऱयांनी दोन्ही बाजूंनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना घेरलेले दिसून आले. पण चीनचे संरक्षणमंत्री फेंगे यांच्याकडे फारसे लक्ष दिलेले दिसले नाही. पाकिस्तानी जनरल देखील वेई बरोबर चालत होते. पण त्यांच्याकडे रशियन अधिकाऱयांचेही लक्ष नव्हते. रशियन सैन्य अधिकाऱयांचे संपूर्ण लक्ष राजनाथ सिंग यांच्यावर होते, असे एकंदर चित्र रशियात पाहायला मिळाले.
चिनी संरक्षणमंत्र्यांकडे कानाडोळा
जेव्हा जेव्हा रशियामध्ये राजनाथ सिंग यांचा चीनच्या संरक्षणमंत्र्याशी सामना झाला तेव्हा पल्ला भारताचाच भारी होता. याचा एक पुरावा म्हणजे एससीओच्या बैठकीपूर्वीचा एक कार्यक्रम. बैठकीपूर्वी राजनाथ सिंग यांच्यासह एससीओचे सर्व संरक्षण मंत्री रशियन सैन्याच्या सर्वात मोठय़ा चर्चमध्ये गेले. येथेही चीनच्या संरक्षणमंत्र्यांकडे दुर्लक्ष केले गेले. राजनाथ सिंग हेसुद्धा चीनच्या संरक्षणमंत्र्यांकडे दुर्लक्ष करत होते. रशियन संरक्षणमंत्र्यांनीही चीनकडे लक्ष दिले नाही. येथे बरेच एससीओ संरक्षण मंत्री उपस्थित होते.