अभाविपची जिल्हाधिकाऱयांकडे मागणी : लॉ कॉलेजच्या परीक्षांबाबत मार्गदर्शन केले नसल्याची तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
लॉ कॉलेजच्या परीक्षांचे कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले नाही. याचबरोबर परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले नाही. असे असताना अचानक लॉ कॉलेजच्या परीक्षा घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून योग्यप्रकारे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
लॉ कॉलेजच्या दोन सेमीस्टर आहेत. त्यासाठी योग्यप्रकारे वेळ मिळणे गरजेचे आहे. मार्गसूची आणि वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर करणे महत्त्वाचे आहे. मात्र याबाबत कोणताच निर्णय यावषी विद्यापीठाने जाहीर केला नाही. किमान 25 दिवस आधी परीक्षा जाहीर करणे गरजेचे आहे. मात्र अजूनही त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दोन सेमीस्टरमध्ये किमान 30 दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे. त्याबाबत विद्यापीठाने नोटीस काढली पाहिजे. परगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सोय देखील केली पाहिजे. विद्यार्थ्यांना पुस्तकेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. तेंव्हा त्याबाबत योग्य तो निर्णय विद्यापीठाने घेऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रोहित उमनादीमठ, सुरेश जमगौडा, किरण दुकानदार यांच्यासह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.