बेळगाव : विद्यार्थ्यांकडे अभ्यासक्रमच नाही. असे असताना काही विद्यापीठे परीक्षांचे नियोजन करून परीक्षा घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना याबाबत कोणतीच मार्गसूची देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी गोंधळलेल्या स्थितीत आहेत. विद्यापीठे आणि सरकारमध्ये समन्वय नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा योग्य ते स्पष्टीकरण सरकारनेच द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनामुळे काही महिने शाळा व महाविद्यालये भरविण्यात आली नाहीत. ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास देण्यात आला. याचबरोबर विद्यार्थ्यांकडून त्या अभ्यासाबाबतची चाचणी परीक्षा घेण्यात आली. आता सेमीस्टार परीक्षा घेण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मात्र, याबाबत विद्यार्थ्यांना पुसटशीही कल्पना देण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे काही अभ्यासक्रमांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबरच काही अभ्यासक्रम कमीही करण्यात आला आहे. असे असताना थेट परीक्षा देणे अशक्मय आहे.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या या समस्या जाणून घेऊनच परीक्षांचे नियोजन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी रोहीत उमनाबादीमठ, संदीप देशपांडे, वृषभ के., कृष्णकुमार जोशी, संतोष कुंभार, मंजुनाथ बिरण्णावर, मल्लेश पुजार यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.