अखेर परीक्षा सुरळीत पार : आता हुरहुर निकालाची : जिल्हय़ात शेवटच्या पेपरला 378 विद्यार्थ्यांची दांडी
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारी दहावीचा शेवटचा पेपर पार पडला. पेपर संपताच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांबाहेर जल्लोष केला. काहींनी तर फटाके फोडून हा आनंद साजरा केला. दहावीची परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावणारा नव्हता. एकमेकांच्या पाठीवर नाव लिहिणे, सेल्फी काढतानाचे चित्र सोमवारी दिसून आले. परीक्षा केंद्रांबाहेर पालकांची मोठी गर्दी झाली होती.
सोमवारी दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर पार पडला. यावषी काठिण्य पातळी कमी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर आनंद होता. कर्नाटकात हिजाबप्रकरण गाजत असल्यामुळे दहावीची परीक्षा वादाविना पार पाडण्याची जबाबदारी शिक्षण खात्यावर होती. कोणताही वाद न होता सुरळीत पद्धतीने परीक्षा पार पडल्याने शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले. परीक्षा केंद्रांबाहेर पदवीपूर्व कॉलेज, कॉम्प्युटर क्लासेसचे प्रतिनिधी जाहिराती वाटण्यासाठी उपस्थित होते.
23 पासून पेपर तपासणीला होणार सुरुवात
दहावीची परीक्षा सोमवारी संपली असली तरी शनिवार दि. 23 पासून पेपर तपासणीला सुरुवात होणार आहे. 22 रोजी केंद्रप्रमुख तसेच पेपर तपासणाऱया शिक्षकांना माहिती देण्यात येणार आहे.
शहरातील महिला विद्यालय, उषाताई गोगटे हायस्कूल, सेंट ऍंथोनी हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल, सेंट झेव्हियर्स स्कूल, सेंट पॉल्स स्कूल, सिद्धरामेश्वर हायस्कूल, महांतेशनगर माध्यमिक शाळेमध्ये तपासणी केली जाणार आहे.
शेवटच्या पेपरला 378 विद्यार्थ्यांची दांडी
सोमवारी विज्ञान पेपरला बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ात 378 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. बेळगाव शहर व तालुक्मयात 183, खानापूर 34 विद्यार्थी अनुपस्थित होते. एकूण 32 हजार 587 विद्यार्थ्यांनी विज्ञान पेपर दिला. त्यामध्ये 91 रिपिटर्स विद्यार्थ्यांचा समावेश होता. दहावीची परीक्षा सुरळीत पार पडल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या चेहऱयावर समाधान होते.
आता निकालाची प्रतीक्षा
दहावीच्या परीक्षेबाबत मनामध्ये बरीच हुरहूर होती. परंतु पहिल्या पेपरपासूनच मनातील भीती कमी झाली. वर्षभर अभ्यास केल्यामुळे परीक्षा अतिशय सोपी गेली. आता निकालाची प्रतीक्षा असल्याचे तिने सांगितले.
साक्षी उसुलकर (विद्यार्थिनी)
सर्वच पेपर सोपे गेल्याने पुढील शिक्षणाचा विचार
कोरानामुळे मागील वर्षात 9 वीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. यावषी दहावीची परीक्षा असल्याने थोडे दडपण होते. परंतु परीक्षा केंद्रावर आल्यावर हे दडपण काहीसे कमी झाले. सर्वच पेपर सोपे गेल्याने आता पुढील शिक्षण घेण्याचा विचार करत असल्याचे नबिदाने नमूद केले.
नबिदा ताशेवाले (विद्यार्थिनी)