प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये पहिल्या डोससह 90 टक्क्यापेक्षा जास्त लसीकरण तसेच दोन्ही डोसचे 70 टक्के लसीकरण झाले आहे, अशा जिह्यांचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्हा अ गटामध्ये समाविष्ट झाल्यामुळे कोविड निर्बंधामध्ये शिथिलतेचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत़
पाचपेक्षा जास्त लोकांना रात्री 10 ते पहाटे 5 या वेळेत बाहेर फिरण्यासाठी लागू केलेली बंदी उठवण्यात येत आह़े तसेच अंत्यविधीला आता व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा राहणार नाह़ी स्पर्धात्मक खेळांना 25 टक्के क्षमतेसह परवानगी राहणार आह़े जिह्यातील ग्रामीण भागातील आठवडा बाजार स्थानिक प्राधीकरणाच्या परवानगी अटी व शर्तींसह चालू करता येणार आहेत. त्यानुसार जिह्यातील सर्व पर्यटन स्थळे, ऑनलाईन तिकीट विक्री करणारी सर्व पर्यटन स्थळे नियमित वेळेनुसार खुली राहणार आहेत़ मात्र पर्यटकांची लसीकरण झालेले असणे आवश्यक राहणार आह़े जिह्यातील स्पा हे 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत़ रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार आहेत़ एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापांमध्ये इतर सुविधा बंद राहणार आहेत़ कर्मचाऱयांचे लसीकरण अनिर्वाय राहणार असल्याचे आदेश डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत.
समुद्रकिनारे, बागा, करमणूक, थीमपार्क व उद्याने सकाळी 9 ते 5 या वेळेत सुरु राहतील़ जलतरण तलाव व वॉटरपार्क, रेस्टॉरंट, उपाहरगृह, नाटय़गृहे, चित्रपत्रगृहे 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील़ आस्थापांनांच्या बाहेर एकूण क्षमता व सध्याची अभ्यागतांची संख्या दर्शवणारा फलक लावणे बंधनकारक राहणार आह़े तसेच लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत़ नाटय़गृहे व चित्रपत्रगृहे रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावीत़ भजने इतर सर्व स्थानिक सांस्कृतिक आ†िण करमणुकीचे कार्यक्रमांना सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्केच लोकांना प्रवेश राहणार आह़े लग्नसमारंभासाठी बंदीस्त सभागृहामध्ये जास्तीत-जास्त 200 लोकांना प्रवेश राहणार आह़े मोकळ्य़ा जागेत जास्तीत-जास्त 200 किवां त्या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल एवढय़ा व्यक्तींना मुभा राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिले आहेत.
–