गोदावरी, मांजरा काठावर चार हजार हेक्टरवर बांबुची लागवड
प्रतिनिधी / कोल्हापूर
पर्यावरणाचा ऱहास हे जागतिक संकट आहे. पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळेच कोरोना सारख्या महामारीचे संकट जगावर कोसळले आहे. भविष्यात अशा संकटांचा सामना करण्यासाठी पर्यावरण संतुलन राखण्यसाठी बांबू लागवड उपयुक्त आहे. यासाठी गोदावरी व मांजरी नदीकाठी अर्थात गोमा खोऱयात 4 हजार हेक्टरवरती बांबू लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती. राज्य कृषीमुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी आज पत्रकार बैठकीत दिली.
येथील शासकिय विश्रामगृह येथे झालेल्या या पत्रकार बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले, पर्यावरणाचा ऱहास होवू लागल्याने जग विनाशाकडे चालले आहे. 250 वर्षापासून पर्यावरण संतुलन बिघडण्यास सुरूवात झाली आहे. जगात औद्योगिकीकरणाला सुरूवात झाल्यापासून संतुलन बिघडण्यास सुरूवात झाली आहे. पृथ्वीरवर असलेल्या झाडांच्या संख्येमुळेच पर्यावरणाचे संतुलन टिकून होते. परंतु वाढत्या वृक्षतोडीसह औद्योगिकरणामुळे ऱहास सुरू झाला आहे. कागदावरती वृक्षलागवडीचे उद्दीष्टपुर्ती दाखवली आहे. जर तेवढी वृक्षसंवर्धन झाले असते तर माणसाला पाय ठेवायलाही जागा मिळाली नसती.
हवेतील वाढता कार्बन घातक ठरू लागला आहे. एनआडीच्या अहवालानुसार चीन आणि अमेरिकेत कार्बन निर्मितीचे प्रमाण अधिक आहे. सध्या हे प्रमाण 422 पीपीएम इतके आहे. जर हे प्रमाण 450 पीपीएम होईल तेव्हा जगाचा विनाश होणार आहे. माणवाच्या संरक्षणासाठी बांबू लागवड उपयुक्त ठरणार आहे. काही दिवसातच 35 लाख एकरात बांबू लागवड आवश्यक आहे. बांबूपासून 4 हजार वस्तू तयार होता. यामध्ये प्रामुख्याने इंधन बचतीसाठी इथेनॉल निर्मितीही होणार आहे. बांबू लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून शंभर वर्षापर्यंत उत्पादन मिळणार आहे. तरी शेतकऱयांनी बांबू लागवडीकडे वळण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राजू शेट्टी सैनिक नसलेले सेनापती
राजू शेट्टी राज्यात आंदोलन करत आहेत. याकडे पटेल यांचे लक्ष वेधले असता त्यांनी सैनिक नसलेला सेनापती अशा तिखट शब्दात शेट्टींवर टिका केली. सांगली- कोल्हापूर मार्गावर ट्रक्टर फिरवून प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी दिल्लीत जाणे अपेक्षित होत. असा टोलाही त्यांनी लगावला. मुळात यांना या आंदोलनात बोलावलेच नाही. त्यामुळे त्यांची गोची झाली. आपण आंदोलनात आहोत हे दाखवण्यासाठी काहीतरी करावे लागते. केंद्र सरकारने केले कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत. एक दोन राज्य सोडली तर देशात शांतता आहे. मात्र राजू शेट्टी हे सैन्य नसलेले पती (सेनापती) आहेत. जर सदाभाऊ खोत यांनी त्यांना सोडले नसते तर ते भाजप सोबतच राहिले असते. आता काही तरी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांना काहीतरी दाखवावे लागत आहे.