पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे आवाहनः आयएमबीत व्याख्यान
प्रतिनिधी /पणजी
पर्यावरण संतुलनासाठी वनराईचे महत्त्व मोठे असून तीचे रक्षण केले पाहिजे. वनराई वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केले.
आयएमबी अर्थात इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेतफ्xढ वनराई विषयी आयोजित केलेल्या व्याख्यानात केरकर बोलत होते. पणजीत आयएमबीच्या सभागृहात व्याख्यानाचा हा कार्यक्रम झाला. यावेळी दत्तगुरू आमोणकर उपस्थित होते.
गोवा हा पूर्वी वनराईने नटलेला होता. परंतु खनिज उत्खनन, वाढते शहरीकरण व विकास प्रकल्प यामुळे वनराई नष्ट होत चालली आहे. ती टिकविण्याचे काम सहसा होत नाही, ही मोठी चिंतेची बाब असल्याचे केरकर म्हणाले.
केवळ झाडे-झुडपे, वनस्पती म्हणजे वनराई नव्हे. तर मोठमोठी झाडे, त्यात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी व इतर गोष्टींचा संचार असतो ती वनराई असते. वनराईवर अनेक जीवजंतू अवलंबून असतात म्हणून ती नष्ट होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. वनराईचे महत्त्व लहान मुलांना शाळेपासूनच शिकवायला हवे. नाहीतर वाढत्या शहरीकरणामुळे वनराई नष्ट होण्याचा धोका संभवतो, असा इशारा केरकर यांनी †िदला.
वनराईमध्ये अनेक औषधी वनस्पतींचा समावेश असतो. पूर्वजांनी त्यांची लागवड केली होती आणि त्यांच्या उपयोग आजही अनेक आजारांवरील उपचारासाठी केला जातो. पूर्वजांनी त्या वनराई चांगल्या सांभळल्या होत्या. परंतु आता तसे होत नाही, अशी ख्ंात केरकर यांनी व्यक्त केली.