सध्या जगभरात सुरू असणाऱया कोरोनाच्या थैमानामुळे पुन्हा एकदा संशोधकांचे लक्ष पर्यावरणाकडे गेले आहे. मानवाच्या पृथ्वीवरील अस्तित्वाची शाश्वती केवळ पर्यावरणाच्या सुरक्षेतच दडली आहे, अशा निष्कर्षाप्रत जगातील जवळपास सर्व पर्यावरण संशोधक आले आहेत. ज्या झपाटय़ाने कोरोनाचा जगभर प्रसार झाला, त्याला पर्यावरणाचा विनाश आणि त्याला जोडली गेलेली मानवाची हाव कारणीभूत आहे. भविष्यकाळात पर्यावरणाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केल्यास याहून अधिक भीषण अशा विषाणूंना तोंड द्यावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठाच्या संशोधकांनी प्रमाणाधारित पद्धतीने हे सिद्ध केले आहे, की दूषित खाणे-पिणे, अनिर्बंध जीवनशैली, सुखासिनतेची हाव आणि कमी श्रमात श्रीमंत बनण्याची आकांक्षा यामुळे मानवी जीवनातून मूल्याधि÷तेची हकालपट्टी झाली आहे. याचे थेट पर्यवसान पर्यावरणाचा समतोल बिघडण्यात झाले आहे. मानवाच्या अमर्याद हव्यासापोटी निसर्गावर अतिरिक्त ताण पडत असून निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण करणारे नाजूक दुवे नाहीसे होत आहेत. याचा परिणाम शेवटी मानवालाच भोगावा लागणार असून कोरोनाचा उदेक हा याच अपरिहार्य प्रक्रियेचा प्रारंभ आहे, असे संशोधकांचे मत आहे.
यावर उपाय म्हणजे पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण हाच आहे. वनस्पती आणि वृक्ष हे सजीव प्राणीसृष्टी आणि निसर्ग यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. पर्यावरण संवर्धनाचा प्रारंभ वृक्षलागवड आणि संगोपन यांच्यापासून केला जाणे आवश्यक आहे. वनांचे पुनरुज्जीवन, दाट मानव वस्तींच्या भागात झाडांची संख्या वाढविणे, अधिकाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करणारे वृक्ष लावणे अशा मार्गाने पर्यावरण सुरक्षिततेची शक्मयता वाढविली जाऊ शकते.