आमदार दिव्या राणे यांचा दावा : पर्ये मतदारसंघातर्फे भाजपा स्थापना दिवस साजरा
प्रतिनिधी /वाळपई
देशाची अस्मिता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी भाजपाचे योगदान महत्त्वाचे आहे ?.राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत चांगल्या प्रकारचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे येणाऱया काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. यामुळे प्रत्येकाने भारतीय जनता पक्षाच्या जडणघडणीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन पर्ये मतदारसंघाचे आमदार दिव्या राणे यांनी केले.
पर्ये मतदारसंघांमध्ये निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची समस्या ही गंभीर बनलेली आहे. ती सोडवण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहे. शक्मयतो वर्षभरात पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकालात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार दिव्या राणे यांनी यावेळी केले.
वाळपई येथील भाजपा कार्यालयात भाजपा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम आमदार दिव्या राणे यांनी भाजपच्या ध्वजाचे अनावरण केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात थेट भाषणामध्ये सहभाग घेतला. यावेळी मोठय़ा प्रमाणात मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार दिव्या राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पर्ये मतदारसंघांमध्ये या मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. यामुळे येणाऱया काळात भाजप सरकारच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाची संकल्पना पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील. सध्या मतदारसंघांमध्ये गाजत असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. टप्प्याटप्प्याने सर्व गावांत चोवीस तास पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
सर्वप्रथम दिव्या राणे व नगर नियोजन व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी व दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना सुमनांजली वाहिली.
वाळपई मतदार संघाच्या कार्यक्रमात बोलताना आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की भारतीय जनता पक्ष यामुळे सत्तरी तालुक्मयाला चांगल्या प्रकारचे संधी निर्माण झालेली आहे. या संधीचे सोने निश्चितच होणार मात्र यासाठी जनतेने येणारा काळात सहकार्य करावे असे आवाहन यावेळी केले. ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष मतदानाच्या माध्यमातून कमी पडलेला आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे असे यावेळी ते म्हणाले.
यावेळी वाळपई नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सेहझीन शेख जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर, देवयानी गावस राजश्री काळे विविध पंचायतीचे सरपंच पंच सभासद प्रमुख कार्यकर्ते व इतर यांची उपस्थिती होती.