पलुस / प्रतिनिधी
केंद्र सरकारने, कष्टकरी शेतकऱ्यांचे जीवन उध्वस्त करणारे कायदे केले आहेत. या तिन्ही कायद्यात शेतमालाला हमीभाव नाकारला आहे. या कायद्याने बाजार समित्या मोडीत काढणाऱ्या व शेतकऱ्यांना व्यापारी आणि बड्या भांडवलदार कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचे कारस्थान केले आहे. हे अन्यायी कायदे रद्द करा व शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देणारा कायदा करा बाजार समित्या खाजगी भांडवलदारांच्या हातात न जाणारा कायदा करा व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अमलात आणा, यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी अभूतपूर्व आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देऊन त्यामध्ये सहभागी होण्याची ग्वाही देऊया, असे प्रतिपादन व्ही. वाय. पाटील यांनी केले.
यानंतर यशवंत बाबर, लालासो भीमराव पाटील, समर्जीत चव्हाण, प्राध्यापक शंकरराव कुंभार, प्रकाश पाटील, महम्मद सैदापूरे, बडे भय, यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर उपस्थित शेतकरी व कार्यकर्त्यांनी अन्यायी कृषी कायद्यांची होळी केली.
याप्रसंगी दिलीप दादा पाटील, दिलीप कृष्णा पाटील, दिलीप जयवंत पाटील, शंकर पाटील, रणवीर गायकवाड, पांडुरंग हजारे, पंढरीनाथ पाटील, उल्हास पाटील, दलित मित्र भगवानराव जाधव, चंद्रकांत पाटील, श्रीरंग जाधव, अधिक पाटील, उत्तम हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गावचे सुपुत्र पैलवान विष्णू नागराळे यांना स्मृतिदिनानिमित्त सुरुवातीला आदरांजली वाहणेत आली.