प्रतिनिधी/ सातारा
सचिन तेंडुलकरला शेतकऱयांच्याबाबत ज्ञान नसले तर जो अन्न खातो त्याला शेतकऱयाचे ज्ञान असते. तसे शरद पवार यांनी कुठे कुस्त्या खेळल्या, कुठे लंगोट शिवली तरीही ते कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष, कुठे बॉलिंग केली कुठे बॅटीग केली तरीही ते क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होतेच ना. पवारांचे वागणे म्हणजे ‘चीत भी मेरी अन् पट भेरी’ असे आहे, असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केला.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे शंकर शिंदे, मधुकर जाधव, सचिनकुमार नलवडे, प्रकाश साबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, दोन महिन्यापेक्षा जास्त काळ सुरु असलेलं आंदोलन हे नेमकं कोणत्या उद्देशाने सुरु आहे. कोणत्या हेतूने सुरु आहे, शंकास्पद आहे. जे लोक मोदींना जनाधाराच्या माध्यमातून हरवू शकत नाहीत. ते आंदोलनात घूसून शेतकऱयांचा बुरखा पांघरुण शिरले आहेत. ह्यांना शेतकऱयांची चिंता नाही ना शेतकऱयांच्या प्रश्नांची. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेती उत्पादन पिछाडीवर होते. 1965 नंतर नवे तंत्रज्ञान आले. अनेक उत्पादन वाढवली. आता प्रश्न हा आहे की उत्पादन वाढवण्याचा नाही, वाढलेलं उत्पादन विकण्याचा आहे. मार्केट उपलब्ध करण्याचा प्रश्न आहे. तोच प्रश्न सोडविण्यासाठी हे तीन कृषी विधेयक आणले आहेत. 70 वर्षात जे झाले नाही ते आता होत आहे. जसे घुबडाला उजेडाची भीती असते. तसे काही घुबडांना शेतकऱयांच्या नावावर आंदोलन करुन अंधाराच साम्राज्य हवं आहे. म्हणजे त्यांना शेतकऱयाचे खळं लुटता येईल, असे त्यांना वाटते.
गेल्या 70 वर्षात मार्केट कमिटय़ा का मोठय़ा झाल्या. शेतकऱयांच्या तीन पिढय़ा मातीत गेल्या, त्या लकवा भरलेल्या व्यवस्थेमुळे. तीन कृषी विधेयकांमुळे शेतकऱयांना स्वातंत्र्य मिळाले आहे. काही मंडळी हमी भावाची मागणी करतात. हमी भाव हा व्यापारी देत नसतो तर सरकार देत असते. बाजारपेठ नियंत्रण ठेवण्याचे त्यांचे षडयंत्र आहे. हमी भावाने सरकार माल गोळा करू शकते. कोणा एकाच्या शेतातील माल खरेदी करू शकत नाही. व्यापारी मात्र करु शकतात. बाजारात भाव पडतात तेव्हा सरकारने हस्तक्षेप करायचं असतो. या आंदोलनात ज्या मागण्या केल्या जात आहेत, त्या म्हणजे आम्हाला आकाश द्या, चंद्र तारे द्या, अशा आणाभाका करायच्या. जे मिळत नाही ते मागायचे.
या आंदोलनाकडे पहात असताना चर्चा सरकार करत आहे, पण ह्या आंदोलनकर्त्यांनाच आंदोलन संपवायचे नाही. या आंदोलनाला शेतकऱयांचा पाठींबा नाही. रिहान पॉप गायक ट्विट केलं आपल्यातील काही लोकांनी ट्विट केलं. सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटवरुन त्यांच्यावर शरद पवारांनी आरोप केला. जो अन्न खातो त्याला शेतकरी कळतो. पण जो दोन टाईम ताटात भाजीभाकर खात असेल तर त्याला कसा कळणार शेतकरी असे सांगत सचिनला त्या विषयावर काही मंडळी ज्ञान विचारत आहेत. मुळात पवारसाहेबांना कधी क्रिकेटचे ज्ञान आले. त्यांनी कधी बॉलिंग केली. त्यांनी कधी बॅटींग केली. तरीही ते कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी लंगोट लावून कुठे कुस्त्या खेळल्या, कुठे खिस्ताक लावले. कुठल्या टेलरकडे लंगोट शिवली हे सांगितले तर त्या टेलरला आम्ही विचारु. चित भी मेरी आणि पट भी मेरी, अस काहीस पवारसाहेबांचे आहे, अशी टीप्पणी करत दिल्लीतील आंदोलन हे शेतकरी विरोधी आंदोलन आहे, शेतकरी आड येणारे आंदोलन आहे.
या आंदोलनाला पाठींबा देणारे बुद्धीजीव मंडळी एक शेपूट लावतात अन् भाषण करतात अन् घरी जावून गोधडय़ात जाऊन झोपतात. ज्यांच्या शेताशी काही सबंध नाही, ते पाठींबा देत आहे. झुणका भाकर 1 रुपयात, पाच रुपयात शिवशाही थाळी म्हणजे आमच्या शेतकऱयाच्या ज्वारीची किंमत काय, तुरडाळीची किंमत काय. सगळे फुकटे दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देतात. सरकारने त्यांच्याशी चर्चाची दारे बंद करावीत. चर्चा कोणाशी करायची. तर जे शेतकऱयांच्या हितासाठी भांडतात त्यांच्याशी. आम्ही आंदोलन केली होती. पण तीन तीन चार चार महिने आंदोलन करणाऱयांना गुरेढोरे आहेत का?, शेतीतील कामे आहेत काय?, त्यांचा व्यवसाय नेमका शेती आहे काय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
माझ्यासाठी राजू शेट्टी यांचा विषय संपलेला आहे
मी शरद जोशी यांच्या तालिमीतला पट्टय़ा आहे. मी शेतकऱयांचे अर्थकारण पहातो. भावनेवर आधारित राजकारण करत नाही. वारीला अनेक दिंढय़ा निघतात. राजू शेट्टी यांचीही एक दिंडी आहे. त्यांनी स्वतःचेच अभंग रचले आहेत. आम्ही शरद जोशी यांचे विचार पुढे नेतो आहे. माझ्यासाठी राजू शेट्टी यांचा विषय संपलेला आहे, असेही सदाभाऊ खोत यांनी भूमिका सष्ट केली.
मनमोहन सिंग, पी.व्ही नरसिंहराव यांचे कौतुक
मी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, मनमोहन सिंह यांचा आदर करतो. मी प्रांजळपणे सांगतो की जागतिक मंदीत त्यांनी देश उभा केला. परंतु मनमोहन सिंग यांच्या काँग्रेस पक्षाला युटर्न घेतला आहे, असे सांगत पवार साहेबांच आत्म चरित्र जरी कृषी नीती म्हणून लागू केल तरी या तीन कृषी कायद्यासारखे आहे. त्यांनी लिहिलेल आत्मचरित्र खोटं लिहलं आहे काय, माणस राजकारण का अशी वागतात. हा देश भावनाप्रधान आहे. किती जरी चुका केल्या अन् एकदा पावसात भिजले की माणस त्यांना माफ करतात, अशी टीप्पणी केली. राज्यात एफआरपी देणारं हे सरकार आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो आहे. येणाऱया अधिवेशनात आवाज उठवला जाईल तसेच लवकरच सातारला परिषद घेत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.