वार्ताहर/ वाठार किरोली
मंत्री बाळासाहेब पाटील वाठार किरोली येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात म्हणाले की
वाठार किरोली हे बाजारपेठेचे गाव असल्याने याठिकाणी पशुवैद्यकीय इमारतीची गरज होती. सातारा जिल्हा कै. यशवंतराव चव्हाण साहेबांची पाठराखण करणारा जिल्हा आणि त्यानंतर आदरणीय शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा जिल्हा आहे. जिल्हा परिषद आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत असतात. त्यासाठी चांगल्या विचारांची संघटना असेल तर कामे करता येतात. मागील पाच वर्षांच्या कालखंडात पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय झाला . लगेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे आणि अतिवृष्टीमुळे काही कामांना विलंब झाला , जिल्हा नियोजनचा निधी वेळेत कसा खर्च होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. अजितदादा पवार साहेब अर्थमंत्री असल्या कारणाने विकासकामांना जादा निधी मिळेल . निधीच्या बाबतीत कोणतीही अडचण जिह्याला होऊ देणार नाही.
पशुवैद्यकीय दवाखान्याची नवीन इमारत सुसज्ज होईल. यामध्ये ऑफीस, स्वच्छताग्रह, पशुवैद्यकीय अधिकारी निवास अशी इमारत लवकरात लवकर पूर्ण होईल. पशुधन हे कमी होत चाललेय , वाठार किरोलीसह परिसरातील गावामध्ये 2012 च्या जनगणेनुसार गाई 2451, म्हैशी 3850, शेळ्या – मेंढय़ा 2444, कोंबडय़ा 6295 एवढया आहेत. घरामध्ये गाई असावी त्यात देशी गाई असावी अशी लोकांची इच्छा असते. पण त्यामध्ये साथीच्या रोगांचा बंदोबस्त केला पाहिजे. त्यासाठी अधिकायांनी त्यांना सेवा देण्याचे काम केले पाहिजे. या इमारतीमुळे वाठार किरोलीच्या वैभावात भर पडेल.
मला आनंद होतोय कि वाठार किरोली विभागातून मी सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून राजकारणात आलो.
योगायोगाने मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर विधानसभेला हा भाग जोडला गेला , त्यामुळे 2009 पासून मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यावेळी तर उच्चांकी मताधिक्य देऊन तुम्ही सहकार्य केले. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने बेरजेचे राजकारण करत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम केले आहे. पवार साहेब म्हणतात 80ज्ञ् समाजकारण आणि 20ज्ञ् राजकारण ही भूमिका आम्ही घेतो.
विधानसभेच्या निवडणूका झाल्यानंतर स्वप्नात ही वाटले नव्हते की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार येईल पण आदरणीय पवार साहेबांमुळे ते शक्य झाले आणि मला सहकार व पणन मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
महात्मा जोतीराव फुले कर्जमाफी योजनेतून थकबाकीदारांना 2 लाखापर्यंत माफी देण्याचे काम सुरु आहे. तसेच रेग्युलर परतफेड करणाया सभासदांना लवकरच दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कृषी सभापती मंगेश धुमाळ म्हणाले , सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत हा विभाग आहे. पशुधन हा शेतीपूरक व्यवसाय वाढविण्याचा व्यवसाय आहे. पशुधन आणि पशुसंवर्धनाची काळजी या विभागाच्या माध्यमातून घेतली जाते, शेतकयांची आर्थिक उन्नती होणारे खाते मला मिळाले आहे . पशुसंवर्धन विभागाला मंत्री महोदयांनी झुकते माप द्यावे. पशुसंवर्धनाचा स्टाफ कमी असल्याने शेतकयांना मदत करताना अडचणी येतात त्यामुळे राज्य सरकारने नोकरभरती करण्याची परवानगी द्यावी.
चौकट
वाठार किरोलीचे सुपुत्र संभाजीराव गायकवाड यांनी सतत जिल्हा परिषदेमध्ये पाठपुरावा करून या इमारतीची वारंवार मागणी केली त्यामुळेच या इमारतीला निधी दिला. कार्यक्रमाचे सुंदर नियोजन त्यांनी केले .
उपाध्यक्ष प्रदीप विधाते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याठिकाणी 50 लाख रुपये निधी देऊन मुहूर्त केला. पशुधन कमी होत चाललेय ते पशुधन वाढविण्याची जबाबदारी आपण घेतल्यामुळे हा दवाखाना उभा राहतोय . पशुसंवर्धन विभागात 709 पदे रिक्त आहेत मी मंत्री महोदयांना विनंती करतो की विविध विभागामध्ये कर्मचायांची गरज आहे . कर्मचारी भरण्यासाठी आपण प्रयत्न करावे. यानिमित्ताने पालकमंत्री साहेबांच्या मतदारसंघात काम करण्याची संधी मिळाली.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनीलराव माने, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, कराड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष देवराज पाटील, कोरेगाव पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, युवा नेते सागरदादा पाटील, आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर, संभाजीराव गायकवाड, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री भाग्यवंत, कांतीलाल पाटील, पांडुरंग (बुवा ) गायकवाड, बंडा गोडसे, संदीप मांडवे, संतोष घार्गे, भरत देशमुख, नंदकुमार माने, रमेश माने, संजय जगदाळे, भागवत घाडगे, अशोकराव पवार, वसंत कणसे, पांडुरंग
( दादा) गायकवाड , काकासो गायकवाड,जयहनुमान घाडगे, तानाजीराव साळुंखे, सरपंच सविता गुजले, उपसरपंच पोपट गायकवाड, तहसीलदार रोहिणी शिंदे, बीडीओ क्रांती बोराटे, सहाय्यक निबंधक संजयकुमार सुद्रीक , पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी अभंग मॅडम, जिल्हा परिषदेचे अधिकारी ,पंचायत समिती अधिकारी , विविध संस्थाचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सोमनाथ महाराज यांनी केले , आभार किशोर गायकवाड यांनी मानले.