प्रतिनिधी/ सातारा
कोरोना सारख्या महामारी मध्ये लोकडाऊन मुळे शहरातील लोकांचे रोजगार , गेले, अशा परिस्थितीमध्ये ब्रयाच लोकांचे गावाकडे स्थलांतर झाले, खेडय़ाकडे शेतीचे विभाजनामुळे बरेच जण अल्पभूधारक. या परिस्थितीमध्ये उदरनिर्वाह करणे अवघड असताना पशुपालन हा व्यवसाय निश्चितच ग्रामीण अर्थव्यवस्थेतील ला मोठा हातभार लावत आहेत. असे विचार पशुसंवर्धन तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती सातारा चे डॉ. सुयोग वाघ यांनी मांडले.
ते पुढे म्हणाले की कोरोना काळामध्ये रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त आहाराचा सल्ला दिला जातो व हि गरज भागवण्यासाठी अंडी ,मांस, दूध याला चांगली मागणी व दर प्राप्त होत आहेत. तसेच अतिवृष्टी असो, दुष्काळ असो किंवा नुकतेच येऊन गेलेले चक्रीवादळ असो यानंतर शेतकरी बांधव होरपळत असताना त्याला उभारी देण्यासाठी पशुपालन हा व्यवसाय निश्चितच नवसंजीवनी ठरत आहे.
त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिला देखील परसातील कुक्कुटपालन च्या माध्यमातून घरकाम व शेती काम सांभाळून करून अंडी विक्री च्या माध्यमातून रोजगार क्षम होऊन कुटुंबाला हातभार लावू लागल्या आहेत. अनेक तरुण मित्र उच्च शिक्षण घेऊन देखील आधुनिक पद्धतीने शेळीपालन करून मोठय़ा प्रमाणावर नफा मिळवत आहेत. देशी गाईंच्या दूध, गोमूत्र ,तूप यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे मोठय़ा प्रमाणावर मागणी व किंमत मिळत आहे. अशा पद्धतीने पशूपालन हा रोजगार निर्मितीचा एक उत्तम पर्याय ठरत आहे.