नवी दिल्ली : ऑनलाईन टीम
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. अशा परस्थितीत कोणत्या कोणत्या पक्षाच्या प्रचार रॅलीत हिंसेच्या घटना समोर येत आहेत. कधी एकाद्या पक्षाचा कार्यकर्ता तर कधी नेता जखमी झाल्याची घटना समोर येत आहे. बुधवारी देखील असेच घडले. पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बॉम्बहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका मुलीसह तीन लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. एकूण १५ ठिकाणी बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला भाजप नेते अर्जुन सिंग यांच्या घरापासून काही अंतरावरच झाला आहे.
पोलिसांनी लावलेल्या तीन सीसीटीव्हीची देखीली तोडफोड करण्यात आली आहे. भाजप नेते मुकुल रॉय यांनी या हल्ल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे सांगितले.
या घटनेविषयी अर्जुन सिंग म्हणाले की, आम्ही मागील १०-१२ दिवसांपासून पोलिसांशी संपर्क साधला असतानाही पोलिसांकडून पुरेशी काळजी घेण्यात आलेली नाही. तसेच निवडणूक आयोगालाही कायदा-सुव्यवस्थेची पुरेशी कल्पना दिलेली होती. असे असताना बॉम्बहल्ल्याची घटना घडली आहे. खरं तर सत्ताधाऱ्यांच्या सुचनेनुसार पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवर केला आहे.