6 जिल्हय़ांमधील 45 विधानसभा जागांवर 17 एप्रिलला मतदान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक मतदानाच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार समाप्त झाला आहे. कोरोना स्थितीचा विचार करून एक दिवस आधीच प्रचारकार्य थांबविण्यात आले आहे. या टप्प्यात 17 एप्रिलला मतदान होणार असून राज्यातील सहा जिल्हय़ांमधील 45 जागांमधील मतदान मतदान करणार आहेत.
आतापर्यंत या राज्यात मतदानाचे चार टप्पे पार पडले असून 135 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आणखी 159 मतदारसंघांमध्ये आणखी चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. जाहीर प्रचार एक दिवस आधीच थांबविण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मतदारांना भयमुक्त रितीने आणि त्यांच्या इच्छेनुसार मतदान करता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वक्तव्यात स्पष्ट करण्यात आले आहे.
दिग्गज नेते प्रचारात
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी विविध पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचारात भाग घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी बुधवारी कोलकात्यात चार कार्यक्रमांचे आयोजन केले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दोन सभा घेतल्या. नड्डा यांनी वर्धमान जिल्हय़ात 2 सभांमध्ये भाषणे केली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अनेक जाहीर सभांमधून जनतेशी संवाद साधला. काँगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2 जाहीर सभा घेतल्या.