पावसामुळे भातपीक पडून भिजल्याने आडवावरच करावी लागतेय मळणी
वार्ताहर /किणये
तालुक्मयाच्या पश्चिम भागात भात मळणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे .गेल्या वीस-पंचवीस दिवसापूर्वी तालुक्मयात परतीचा पाऊस झाला. या परतीच्या पावसात भातपीक आडवे झाले. काही शिवारातील भातपीक भिजले होते. यामुळे या भातपिकाची कापणी करून आडवावरच लवकर मळणी शेतकऱयांना करावी लागत आहे.
काही ठिकाणचे भात ऐन पोसवणीला व काही ठिकाणचे कापणीला आले असतानाच पाऊस झाला. यामुळे पिके खराब झाली आहेत. पावसाच्या विश्रांतीनंतर शिवारातील पाणी नाल्याद्वारे काढून निचरा केला. त्यानंतर भिजलेल्या भात पिकाची कापणी केली. भिजलेले भात जास्त दिवस गवतगंजीत ठेवता येत नाही. ठेवल्यास उर्वरित भातही पूर्णपणे खराब होण्याची शक्मयता असते. त्यामुळे कापणी केलेले भातपीक थेट खळय़ावर आणून मळणी करतानाचे चित्र तालुक्मयाच्या पश्चिम भागात पहावयास मिळत आहे.
कर्ले, बेळगुंदी, कावळेवाडी, जानेवाडी, बेळवटी, इनाम बडस, बाकनूर, सोनोली, येळेबैल, बोकनूर, किणये, संतिबस्तवाड, वाघवडे या भागात मळणीच्या हंगामाला सुरुवात केली आहे. काही पाणथळ शिवारातील भात कापणीसुद्धा करू लागले आहेत.
हंगाम एकदाच आल्याने शेतमजुरांची टंचाई
सुगी हंगाम एकदाच आल्यामुळे शेतमजुरांची टंचाई भासत असल्याची माहिती शेतकऱयांनी दिली. शेतमजुरांची टंचाई निर्माण झाल्यामुळे काही शेतकरी आपापसामध्ये एकत्रितपणे मळणीचा हंगाम साधत आहेत. बहुतांशी शिवारात ट्रक्टरच्या साहाय्याने मळणी करण्यात येत आहे.
शेतकऱयांना नुकसान भरपाई द्या– नवनाथ खामकर
परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये भात पिकेही खराब झाली आहेत. कृषी खात्यामार्फत व प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱयांना आर्थिक सहकार्य करावे अशी आम्हा शेतकऱयांची मागणी आहे. यामुळे शेतकऱयांकडे प्रशासनाने अधिक लक्ष देण्याची गरज आहे.