ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक मजूरांना त्रास सहन करावा लागत आहे. काही मजुरांनी तर गेल्या काही दिवसांपासून पायी, बस ने आपल्या घरी जाण्यास सुरुवात केली. मात्र, आता पहिल्यांदा हे मजूर विमानाने आपल्या गावी परतत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून 177 मजूरांना घेऊन विमान रांचीला रवाना झाले आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने मजुरांना विमानतळापर्यंत पोहोचवण्यात आले. ज्यावेळी विमान रांचीमध्ये पोहचेल त्यावेळी स्वतः श्रममंत्री तेथे उपस्थित राहणार आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटे दोन वाजता 177 मजुरांची रांग लागली होती. हे मजूर सकाळी सहा वाजताच एअर एशियाच्या विमानाने प्रवास करण्यासाठी विमानतळावर उपस्थित होते. बंगळूरू लॉ स्कूल एलूमनाई असोसिएशनच्या प्रियांका रमन प्रत्येक मजूर विमानतळावर पोहोचलो आहे ना याची खात्री करून घेत होत्या.
याबाबत अधिक माहिती देताना प्रियांका रमन म्हणाल्या की, रांची मधील बऱ्याच प्रवाशांना रांची मध्ये जायचे होते, हे आम्हाला माहिती होते. यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि त्यांना परत त्यांच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, झारखंडमधील मजूर विमानाने परत आपल्या राज्यात येत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. अंदमानात अडकलेल्यांना आणण्यासाठी लवकरच आणखी दोन विमाने रांची येथे उतरतील असे सांगत पुढे ते म्हणाले की राज्य सरकार विमानाचे भाडे देत आहे.