प्रतिनिधी/ बेळगाव
‘खुशहाल किसान, समृद्ध राष्ट्र’ असे ब्रिद वाक्मय घेऊन सुरू केलेल्या पहिल्या किसान रेल्वेला बेळगावमधून हिरवा झेंडा दाखविण्यात आला. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला. कर्नाटक राज्य सरकारने मागणी केल्यास येथूनही किसान रेल्वे सोडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील देवळाली येथून बिहार राज्यातील दाणापूरपर्यंत ही पहिली किसान रेल्वे धावणार आहे. दूध, भाजीपाला, फळे यांची वेळेत वाहतूक व्हावी. याकरिता मध्य रेल्वेने ही रेल्वे सुरू केली आहे. देशातील ही पहिलीच रेल्वे आहे. यामुळे शेतकऱयांना आपला माल काही वेळात ग्राहकांपर्यंत पोहोचविता येणार आहे.
या रेल्वेचा शुभारंभ नाशिकच्या देवळाली रेल्वे स्थानकावर झाला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.