प्रतिनिधी/बेळगाव
जिह्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणूका दोन टप्प्यात होत आहेत. पहिल्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले असून पहिटप्प्यात 259 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. एकूण 4 हजार 269 ग्राम पंचायत सदस्य संख्या असून त्यासाठी 8 हजार 767 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये अर्ज माघे घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच रिंगणात कितीजण राहणार हे समजणार आहे.
जिह्यातील पहिल्या टप्प्यामध्ये बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, मुडलगी या तालुक्मयातील ग्राम पंचायतीचे मतदान 22 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता प्रचाराला वेग आला असून उमेदवार प्रत्येक मतदाराची गाठीभेटी घेताना दिसू लागले आहेत. ही निवडणूक रंगतदार होत असून पक्षीय राजकारण बाजुला ठेवून अनेक जण स्वतःची ताकद दाखविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
बऱयाच ठिकाणी उमेदवारी देताना नाराजी व्यक्त झाली आहे. त्याचा फटकाही काही जणांना बसण्याची शक्मयता नाकारता येत नाही. पहिल्या टप्प्यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 55 ग्राम पंचयातीची निवडणूक होत आहे. एकूण 1 हजार 37 सदस्य संख्या आहे. यासाठी 1 हजार 882 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. अनुसुचित जाती, जमाती तसेच मागासवर्गीयही काही ठिकाणी चुरस सुरू आहे. एकूण 52 सदस्यांची बिनविरोध निवडणूक होण्याची शक्मयता आहे. कारण त्या ठिकाणी एकच अर्ज दाखल झाल्याने ते बिनविरोध होणार आहेत. मात्र अर्ज माघरीनंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे. बेळगाव नंतर सर्वांत जास्त हुक्केरी तालुक्मयामध्ये अर्ज दाखल झाले आहेत. एकूण 880 जागांसाठी 1800 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर गोकाक तालूक्मयात 620 जागांसाठी 1561 अर्ज दाखल झाले आहेत. खानापूर तालुक्मयामध्ये 623 जागांसाठी 1501 अर्ज दाखल झाले आहेत. बैलहोंगल 518 जागांसाठी 730 अर्ज दाखल झाले आहेत. मुडलगी तालुक्मयामध्ये 347 जागांसाठी 826 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. कित्तूर तालुक्मयामध्ये 234 जागांसाठी 467 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीला रंगत चढणार आहे.