सकाळपासूनच मतदान केंद्रासमोर रांगा, किरकोळ घटना वगळता शांततेने मतदान पार
प्रतिनिधी/ बेळगाव
राजकारणाचा पहिला पाया म्हणून ग्राम पंचायतीच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. गाव पातळीवर ही निवडणूक असल्यामुळे नेहमीच या निवडणुकीत चुरस असते. पहिल्या टप्प्यामध्ये बेळगाव तालुक्मयासह सात तालुक्मयांत मतदान होते. हे मतदान अत्यंत चुरशीने पार पडले असून 82.70 टक्के मतदान झाले आहे. काही किरकोळ घटना वगळता अत्यंत शांततेने पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. आता दुसऱया टप्प्याकडेच साऱयांचे लक्ष लागले आहे. बेळगाव तालुक्मयात 86.60 टक्के मतदान झाले आहे. सर्वात जास्त बेळगाव तालुक्मयात मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, मुडलगी तालुक्मयांचा समावेश आहे. एकूण 259 ग्राम पंचायतीचे मतदान पार पडले असून 4 हजार 259 जणांचे भवितव्य मंगळवारी पेटीबंद झाले आहे. बेळगाव तालुक्मयातील 55, खानापूर तालुक्मयातील 51, हुक्केरी तालुक्मयातील 52, बैलहोंगल तालुक्मयातील 33, कित्तूर तालुक्मयातील 16, गोकाक तालुक्मयातील 32 आणि मुडलगी तालुक्मयातील 20 ग्राम पंचायतींचे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण 13 लाख 2 हजार 25 मतदार आहेत.
ग्राम पंचायत निवडणूक म्हणजे अत्यंत ईर्षेने होत असते. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. बेळगाव तालुक्मयातील येळ्ळूर, बेळगुंदी, उचगाव, हिंडलगा, सांबरा, सावगाव, बेकिनकेरे, बेनकनहळ्ळी, काकती, होनगा, बाळेकुंद्री, धामणे, देसूर यासह इतर गावांमध्ये मोठय़ा चुरशीने मतदान झाले. महाराष्ट्र एकीकरण समितीबरोबरच यावेळी राष्ट्रीय पक्षांनीही या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. सात तालुक्मयामध्ये एकूण 12 लाख 64 हजार 158 मतदार आहेत. त्यामधील 10 लाख 45 हजार 479 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 82 टक्क्मयांपेक्षाही अधिक मतदान झाले असून सर्वत्र चुरशीने ही निवडणूक पार पडली आहे.
पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक नसली तरी आपल्या समर्थकांना पाठिंबा राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांनी दिला होता. तरी देखील मराठी भाषिकांनी एकजुट दाखविण्यासाठी म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा निवडणूक लढविली असून बहुसंख्य ग्राम पंचायतींवर भगवा झेंडाच फडकणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांमध्ये उमेदवारांनी प्रत्येकाच्या घराचे उंबरठे झिजवले होते. अत्यंत प्रति÷sची ही निवडणूक केली होती.
अत्यंत ईर्षेने मतदारांना बाहेर काढुन मतदान करण्यात कार्यकर्ते जुंपले गेले होते. काही ठिकाणी किरकोळ वादावादी झाली. मात्र गाव पातळीवरच ही वादावादी मिटविण्यात आली. ग्राम पंचायतीला थेट निधी मिळत असल्यामुळे दरवषी ग्राम पंचायतीला मोठा निधी मिळत असतो. त्यामुळे अनेक उमेदवारांनी या निधीतून विकास साधण्यासाठी ही निवडणूक लढविल्याचे सांगितले होते.
काही वॉर्डांमध्ये 10 ते 15 उमेदवार उभे आहेत. त्यामुळे अत्यंत चुरशीने मतदान पार पडले. देसूरमध्ये दोन दिवसांपूर्वीच मतपत्रिका बाहेर पडल्याने गोंधळ उडाला होता. तर मतदानादिवशी निवडणूक अधिकाऱयाकडेच रिव्हॉल्वर सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. मतदान केंद्रांच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस पथके वारंवार विविध मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी करत होते. त्यामुळे अत्यंत शांततेत हे मतदान पार पडले आहे.
मतदान केंद्रासमोर थर्मल स्किनिंगबरोबरच सॅनिटायझरही ठेवण्यात आले होते. मात्र बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करुन मतदान करण्याकडेच लक्ष देत होते. मास्क परिधान करण्यास सांगण्यात येत होते. मात्र काही महिला तसेच नागरिक मास्क नसतानाही मतदान केंद्रांवर दाखल झाले होते. त्यांना मास्क परिधान करुन या म्हणून पाठविण्यात आले होते.
तालुक्मयातील गावांमध्ये असलेल्या सरकारी व खासगी शाळांमध्ये हे मतदान घेण्यात आले. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडल्याचे दिसून आले. प्रत्येक जण केवळ ईर्षेने मतदान करताना दिसत होता. त्यामुळे तो कोणाच्याच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांना सॅनिटायझर व थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी जुंपण्यात आले होते. याचबरोबर ग्राम पंचायतमधील कर्मचाऱयांनाही गेटवरच उभे करण्यात आले होते.
मास्क नसलेल्या मतदारांना प्रवेश देण्यात येत नव्हता. तर प्रवेश करतानाच थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझर करण्यास काही ठिकाणी भाग पाडण्यात येत होते. तर काही ठिकाणी मात्र मतदार राजाच त्याकडे दुर्लक्ष करत होता. निवडणूक अधिकाऱयांनी बऱयाच ठिकाणी सोशल डिस्टन पाळण्याची सूचना वारंवार केली. मात्र बऱयाच जणांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
हिरेबागेवाडी येथे या कारणावरुनच पोलिसांशी काही जणांनी हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. मतदानासाठी महिला वर्गाबरोबरच वृध्द, नागरिकही मतदान केंद्रांवर येत होते. काही जणांनी स्ट्रेचर तसेच विलचेअरवरुन त्यांना आणल्याचे पहायला मिळत होते. एकूणच हे मतदान अत्यंत चुरशीने पार पडले असून बुधवार दि. 30 रोजी मतमोजणी होणार आहे.