प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱया पांगुळ गल्ली येथे सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडीमुळे केवळ वाहनचालकच नाही तर व्यापारीही नाराजी व्यक्त करीत आहेत. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेले पार्किंग व रिक्षाचालकांचा अतातायीपणा यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
पांगुळ गल्ली येथे खरेदीसाठी बेळगावसह तालुक्मयातील नागरिक येतात. रविवारी विकेंड असल्यामुळे खरेदीदारांची संख्या वाढली होती. प्रत्येकजण आपले वाहन दुकानापर्यंत नेण्यासाठी चढाओढ करत होता. त्यातच रिक्षाचालकांची भर पडली. अश्वत्थामा मंदिरापासून गणपत गल्ली कॉर्नरपर्यंत रस्ता अरूंद आहे. त्यात काही वाहनचालक बेशिस्त पद्धतीने रस्त्याच्या बाजुला वाहने लावत आहेत. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना प्रत्येकालाच करावा लागत आहे.
अश्वत्थामा मंदिरापासून जैन मंदिरपर्यंत रस्त्याचे रूंदीकरण झाले. परंतु दोन्ही बाजुंना वाहनांचे पार्किंग केले जात असल्यामुळे रूंदीकरणानंतरही पार्किंगची समस्या अद्याप काही सुटलेली नाही. सम- विषय तारखांप्रमाणे पार्किंग करणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. यामुळे स्थानिक विपेत्यांनाही व्यापार करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी कायमची सोडवावी, अशी मागणी वाहनचालक व व्यापारी करीत आहेत.