दुपारीच सुरु होऊ लागल्याने प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी /पणजी
रविवारी मुसळधार पावसाने राज्यातील बऱयाच भागाला झोडपून काढल्यानंतर सोमवारीदेखील पावसाबरोबरच जोरदार वादळी बऱयाने झोडपून काढले. दोन्ही दिवस पाऊस दुपारीच सुरू झालेला पाहता पाऊस परतीच्या वाटेवर तर नाही ना? असा प्रशन उभा राहिला आहे.
यंदा 15 मेपासूनच राज्यात पावसाला प्रारंभ झाला. तौक्ते वादळामुळे आलेला पाऊस पुढे नैऋत्य मान्सूनलाच बरोबर घेऊन आला. जुलैअखेरीस राज्यात मुसळधार पावसाने जलप्रलय आल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यानंतर गेल्या तीन चार दिवसांत पावसाचे पुनरागमन झाले आहे. रविवारी दुपारपासून राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला. सोमवारी सकाळी थोडा वेळ हजेरी लावली. त्यानंतर दुपारपर्यंत सूर्यप्रकाश पडला आणि साधारणपणे तीनच्या दरम्यान मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत राज्यातील अनेक भागांत हलक्या सरी पडत होत्या.
पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पावसाचे प्रमाण कमी होईल. पुढील 24 तासांत राज्यात हलक्या सरींची शक्यता आहे. काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
गेल्या 24 तासांतील पाऊस
- सांखळी 2.5
- म्हापसा 2.5
- फोंडा 1 इंच
- जुने गोवे 1 इंच
- काणकोण 1 इंच
- केपे अर्धा इंच
- सांगे अर्धा इंच
राज्यात सरासरी 103 इंच पाऊस
आगामी 24 तासांत राज्यातील किनारी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत राज्यात सरासरी 103 इंच पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो 3 इंचांनी कमी आहे. जुलैमध्ये राज्यता 23 इंच अतिरिकत पाऊस होता. ऑगस्टमध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेने तो 2 इंचांनी कमी झालेला आहे.
शेतीसाठी लाभदायक पाऊस
दरम्यान, सध्या पडणारा पाऊस हा कृषी क्षेत्रासाठी लाभदायक आहे. विशेषतः भातासाटी योग्य पाऊस आहे. आताशा भातशेतांना कणसे आलेली आहेत व आताच पावसाची आवश्यकता आहे. हा पाऊस पडल्याने कणसे दाण्यांनी भरून येतील. शिवाय काकडी, भेंडी, दोडकी, कारली इत्यादी फळभाज्या उत्पादनासाठी हा पाऊस आवश्यक आहे. या पावसाने शेतकरीवर्ग खुश झालेला आहे.