राजौरी
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या राजौरी सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या लष्कराने गोळीबार करून शस्त्रसंधीचा भंग केला आहे. भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले असून पाकिस्ताचे नुकसान केल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी पहाटे अचानक पाकिस्तानी लष्कराच्या एका तुकडीने सीमेवरील भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. नागरीकांची काही घरे आणि या भागातील मशिदीही सुटल्या नाहीत. राजौरीप्रमाणेच नौशेरा विभागातही भारताने चोख प्रत्युत्तर दिले. 2020 मध्ये पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवर 5 हजार 100 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. हा गेल्या 18 वर्षांमधला उच्चांक आहे. पाकच्या गोळीबारात गेल्या वर्षात 12 नागरीकांच्या प्राण गमवावे लागले. 24 सैनिक हुतात्मा झाले आहेत.