ऑनलाईन टीम \ मुबई
पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद(Shaik Rashid) यांनी भारताविरुद्ध देशाचा विजय हा इस्लामचा विजय आहे असे वक्तव्य करुन पाकिस्तान सरकारने विजय साजरा करण्यासाठी क्रिकेट शौकीनांना रस्ते खुले करावेत असे आवाहन प्रशासनाला केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शेख रशीद यांनी म्हटलय की, काही राजनैतीक कामामुळे जरी सामना पाहण्यासाठी स्टेडीयममध्ये नसलो तरी माझ्या शुभेच्छा पाकिस्तान संघाबरोबर होत्या.त्यांनी असा दावा केला आहे की, भारतासह जगभरातील मुस्लिम सामन्यादरम्यान पाकिस्तानला पाठिंबा देत होते.
“पाकिस्तानसाठी आजचा भारत-पाकिस्तान (india-pakistan)सामना अंतिम होता.आणि पाकिस्तानचे खेळाडू एखाद्या सैनिका प्रमाणे लढले हा केवळ क्रिकेटचा विजय नसुन हा इस्लामचा विजय आहे. असे मंत्री शेख रशीद म्हणाले.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेलेला हा सामना पाकिस्तानी खेळाडू मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांच्या कामगिरीमुळे पाकिस्तानने भारतावर दहा गड्यांनी जिंकला. विजय मिळवल्यावर शेख रशीद व्हिडिओ अपलोड केला आहे.