ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
मागील 3 दिवसांपासून पाकिस्तानच्या सिंध, पंजाब, गिलगिट आणि बलूचिस्तान प्रांतात पावसाने थैमान घातला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने 58 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने दिली आहे.
खैबर पख्तूनख्वा या प्रांतात पावसाचा सर्वाधिक प्रभाव आहे. तिथे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. सिंध प्रांतात 12, गिलगिटमध्ये 10, पंजाब व बलूचिस्तान प्रांतात 8 तर पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरात एकाचा मृत्यू झाला आहे.
सिंध प्रांतातील दादू जिल्ह्यातील 20 गावे पाण्याखाली गेली असून, बचावकार्याला वेग आला आहे. 158 घरांची पडझड झाली आहे. बलूचिस्तानच्या क्षेत्रातही घरांचे नुकसान झाले असून, बचावकार्य सुरू आहे.