ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताने आत्तापर्यंत तीन युद्धांमध्ये पाकिस्तानच्या सैन्याला हरवले आहे. पुन्हा त्यांना पराभवाची धूळ चारण्यासाठी 10 दिवस ही लागणार नाहीत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकला इशारा दिला आहे.
आज, दिल्लीच्या करिअप्पा परेड ग्राउंडवर देशभरातून आलेल्या नॅशनल कॅडेट कोरच्या (एनसीसी) विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, सरकारच्या निर्णयामुळे जगभरात मोदींच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, अशी अफवा पसरवली जात आहे. मात्र, स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी मोदींचा जन्म झाला नाही. देशाची प्रतिष्ठाच मोदींसाठी सर्वकाही आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.