ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानात महागाईचा विस्फोट झाला आहे. रावळपिंडी येथे आले 1 हजार रुपये किलो तर सिमला मिरची 200 रुपये किलोने विकली जात आहे. इतर भाज्यांचे दरही जवळपास 200 रुपये किलोच्या आसपास आहेत. इम्रान खान यांची पूर्व पत्नी रेहम खान यांनी एका न्यूज चॅनलचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशात 102 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या साखरेचे दर 81 रुपयांवर आणल्याचा गाजावाजा केला होता. मात्र, भाज्यांचे दर सर्वसामान्य जनतेच्या अवाक्याबाहेर आहेत. इम्रान खान यांच्या चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये महागाई वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानात गहू 80 रुपये किलोने विकला जात आहे. मागील डिसेंबरमध्ये हाच दर 50 रुपये प्रतिकिलो होता. मात्र, यंदा ऑक्टोबरमध्ये गव्हाच्या दराने विक्रम मोडला. ऑक्टोबरमध्ये गव्हाच्या पिठाचा दर 75 रुपये किलो होता.