इस्लामाबाद
दहशतवाद्यांचे आश्रयस्थान झालेल्या पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारतासंबंधी विधान करताना शांततेचा सूर आळवला आहे. जनरल बाजवा यांनी पाकिस्तान तसेच भारताने काश्मीर मुद्दा शांततेच्या मार्गाने सोडवावा असे म्हटले आहे. पाकिस्तान शांतता इच्छित असला तरीही भारत याकरता तयार नसल्याचे अमेरिकेतील बायडेन प्रशासनाला दाखवून देण्याचा बाजवा यांचा हा प्रयत्न असू शकतो. पाकिस्तानी एअरफोर्स अकॅडमीतील संबोधनादरम्यान बाजवा यांनी सर्व दिशांमध्ये शांततेचा हात पुढे करण्याची वेळ असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानची शांततेची इच्छा कुणी कमकुवतपणा मानू नये अस कांगावाही त्यांनी केला आहे.