वृत्तसंस्था/ लाहोर
यजमान पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि शेवटचा 20-20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. तीन सामन्यांची ही मालिका पाकने 2-0 अशा फरकाने जिंकली.
या मालिकेतील गेल्या शुक्रवारचा पहिला सामना पाकने 5 गडय़ांनी जिंकला होता. त्यानंतर शनिवारी दुसऱया सामन्यात पाकने बांगलादेशचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव करून मालिका विजय मिळविला. आता पाकचा संघ या विजयामुळे आयसीसीच्या टी-20 मानांकनात 270 गुणांसह पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया 269 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. बांगलादेशचा संघ 5 फेब्रुवारीला पुन्हा पाकमध्ये येणार असून उभय संघात दोन कसोटी सामने खेळविले जाणार आहेत. पहिली कसोटी रावळपिंडीत 5 फेब्रुवारीपासून सुरू होईल. त्यानंतर एकमेव वनडे सामना 3 एप्रिलला कराचीत तर दुसरी कसोटी 7 एप्रिलला सुरू होईल.