ऑनलाईन टीम / श्रीनगर :
पाकिस्तानी सैन्याने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबानी सेक्टरमध्ये शुक्रवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले.
प्रेमबहादूर खत्री आणि सुखबीर सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत. पाक सैन्याच्या गोळीबारात हे जवान गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचीही प्राणज्योत मालवली.
गुरुवारीही पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत किर्णी, कसबा, दिगवार, मालती आणि दालन सेक्टरमधील लष्करी चौक्या आणि निवासी भागांना लक्ष्य करून गोळीबार केला होता. या गोळीबारात जेसीओ सुभेदार स्वातंत्र्य सिंग (16 गढवाल) आणि किर्णी सेक्टरमधील एक नागरिक गंभीर जखमी झाला होता.