अटकेतील 19 वर्षीय दहशतवादी बाबरची कबुली
@ वृत्तसंस्था / श्रीनगर
लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला भारतीय सैन्याने जिवंत पकडले आहे. तो केवळ 19 वर्षे वयाचा असून अली बाबर असे त्याचे नाव आहे. आपण एक पाकिस्तानी दहशतवादी आहोत असे सांगत बाबरने दहशतवादी कसे झालो आणि भारतात कशाप्रकारे विध्वंस घडवून आणू इच्छित होतो याची कबुली कॅमेऱयासमोर दिली आहे. लष्कर-ए-तोयबाचा एरिया कमांडर, आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याला मला माझ्या आईकडे परत नेण्याचे आवाहन करतो. त्यांनीच मला भारतात पाठविले होते असेही त्याने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दिपलपूर गावचा रहिवासी असलेल्या अली बाबरने 7 वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 2016 मधील उरी सारखा मोठा हल्ला घडवून आणण्याचा कट पाकिस्तानी दहशतवाद्यांनी रचला होता.
लष्कर-ए-तोयबाने केले दहशतवादी
आमचा 6 दहशतवाद्यांचा समूह प्रामुख्याने पाकिस्तानी पंजाबमधील होता. गरीबीमुळे आमची दिशाभूल करण्यात आली. त्यानंतर लष्कर-ए-तोयबात सामील होण्यासाठी प्रलोभनं दाखविण्यात आली होती असा खुलासा दहशतवाद्याने अली बाबरने चौकशीदरम्यान केला आहे.
केवळ 50 हजारांसाठी…
आईच्या उपचारासाठी 20 हजार रुपये दहशतवाद्यांकडून देण्यात आले. तसेच 30 हजार रुपये देण्याचे आश्वासनही मिळाले होते. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱयांमध्ये बहुतांश जण पाकिस्तानी सैन्याचे सैनिक होते असे अली बाबरने सांगितले आहे.
धर्माच्या नावावर चिथावणी
धर्म आणि मुस्लिमांच्या नावावर चिथावणी देत दहशतवादी होण्यास भाग पाडण्यात आले. मुजफ्फराबादमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. धर्म संकटात असून मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचे आम्हाला सांगण्यात येत होते असे दहशतवादी बाबरने चौकशीत सांगितले आहे.
पाक सैन्याकडून प्रशिक्षण
लष्करöए-तोयबा या दहशतवादी संघटनेने 3 महिन्यांचे प्रशिक्षण दिले. यादरम्यान विविध प्रकारची शस्त्रास्त्रs चालविण्यास शिकविण्यात आले. शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱयांमध्ये पाकिस्तानी सैनिकांचे प्रमाण अधिक होते. आमच्या मनातील मृत्यूची भीती दूर करण्यात आली होती असे बाबरने सांगितले आहे. 3 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर या दहशतवाद्यांना भारतात एका मोठय़ा कटाच्या अंतर्गत पाठविण्यात आले होते. 2016 च्या उरीसारखा हल्ला घडवून आणण्यास त्यांना सांगण्यात आले होते.
पाकिस्तानी सैन्याचा खोटारडेपणा
पाकिस्तानी सैन्य, आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबा हे काश्मीरच्या स्थितीबद्दल खोटी माहिती पसरवित आहेत. भारतीय सैन्य रक्तपात करत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. पण काश्मीरमध्ये शांतता नांदत आहे. भारतीय सैन्याने माझी चांगली देखभाल केल्याचे माझ्या आईला सांगू इच्छितो. येथे ध्वनिक्षेपकावर दिवसात 5 वेळा अजान ऐकू शकतो. भारतीय सैन्याची वागणूक पाहता काश्मीरमध्ये शांतता नांदत असावी असे अली बाबरने म्हटले आहे.
10 दिवसांत घुसखोरीचे 3 प्रयत्न 26 सप्टेंबर रोजी एक दहशतवादी मारला गेला होता. उरीमध्ये नियंत्रण रेषेवर 9 दिवसांपर्यंत दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम चालविण्यात आली. यादमयान दहशतवाद्यांसोबत चकमक उडाली. दोन दहशतवादी भारतात घुसले होते. तर 4 दहशतवादी सीमापार होते. कारवाईनंतर 4 दहशतवादी मागे फिरले तर एक दहशतवादी मारला गेला, तर एक दहशतवादी शरणागतीसाठी विनवणी करू लागला होता,