प्रतिनिधी/ सातारा
पाचगणी येथील सध्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद होती. आता मात्र, काहीशी सुरु होत असताना पाचगणीत मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांमळे बाजारपेठेतील व्यापारी त्रस्त झाले आहेत. कुत्र्यांच्या टोळ्यांचा दुकानांसमोरच ठिय्या असतो. दररोज भटक्या कुत्र्यांकडून व्यापाऱयांना दररोज सकाळी त्रास होत आहे. पालिका प्रशासनाने मोकाट कुत्रे व जनावरांसाठी कोंडवाडय़ाचा वापर करावा, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.