वार्ताहर / पाचगाव
बाहेरील जिल्ह्यातून कोणीही व्यक्ती गावात आल्यास त्यांना संस्थात्मक विलगी करणात ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या दक्षता कमिटीने घेतला होता .त्यानुसारच सुट्टीवर आलेल्या सैनिकांना ही संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते अशी माहिती गिरगावच्या सरपंच संध्या पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितली.
सैनिकांचे गाव अशी गिरगाव ची ओळख आहे. या गावातील काही सैनिक सैन्यदलातून सुट्टी घेऊन गावी आले. वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर आपल्या मध्ये कोरणा सदृश्य कोणतीही लक्षणे नाहीत, तसेच सुट्टी अगदी थोडे दिवस मिळाली आहे, सुट्टी संपताच ड्युटीवर जायचे आहे ,आम्हाला होम काँरण टाईन करावे त्यामुळे कुटुंबीयांसोबत राहता येईल अशी विनंती सैनिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. मात्र सरपंच संध्या पाटील व ग्रामपंचायतीने सैनिकांना संस्थात्मक विलगीकरणात 14 दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला .या निर्णयाविरुद्ध सामाजिक संघटना व सैनिकांनी प्रशासनाकडे सैनिकांची बाजू मांडली. प्रशासनाने सरपंचांना या सैनिकांना गृह विलगी करणात ठेवण्याबाबत पत्र पाठवले होते या सर्व प्रकाराबाबत रविवारी गिरगाव येथे सरपंच संध्या पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी बोलताना सरपंच संध्या पाटील यांनी सांगितले की गिरगाव मधील दक्षता कमिटीने सैनिकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. या सैनिकांना घरी विलगी करणात ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. प्रशासनामार्फ या संदर्भातील पत्र ग्रामपंचायतीला मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीने सैनिकांना घरी विलगीकरणात राहण्या संदर्भातील पत्र देण्यात आले. काही गोष्टी गैरसमजातून घडलेल्या आहेत , इथून पुढे सुट्टीसाठी गावात येणाऱ्या सैनिकांना गृहविलगी करणात ठेवण्याचा निर्णय दक्षता कमिटीने घेतला आहे असे सरपंच संध्या पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस सरपंच ,उपसरपंच, पोलीस पाटील उपस्थित होते.