प्रतिनिधी / कोल्हापूर
शेतकऱयांची मालकी असलेल्या राज्यातील 42 सहकारी साखर कारखान्यांवर सर्वच राजकिय नेत्यांनी दरोडा टाकलेला आहे. या प्रकरणी पाच वर्षापूर्वीच पुराव्यासह सक्त वसुली संचालनालय (ईडी) कडे तक्रार केली होती, मात्र काहीही केले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्र देताच जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई केली. त्यामुळे पाच वर्षे ईडी झोपा काढत होती, कुणाच्या इशाऱयाची वाट बघत होती. असा खडा सवाल शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. दादांचे हात स्वच्छ आहेत. असे मानले जाते म्हणून त्यांनी जरंडेश्वरवर न थांबत अशाच पद्धतीने घशात घातलेल्या 41 कारखान्यांवर कारवाई करण्यास ईडीला भाग पाडून शेतकऱयांना न्याय द्यावा. असे आवाहनही शेट्टी यांनी केले.
सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱयांच्या घरावर दरोडा टाकला
जरंडेश्वरवरसह दोन दिवसात कवडीमोल किमतीला विकल्या गेलेल्या कारखान्यांची चौकशीची सातत्याने मागणी केली होती. असे सांगत राजू शेट्टी म्हणाले, ईडी कडेही पुरावे सादर केले होते. मात्र ईडीने माझ्या तक्रारीवर उत्तरही दिले नाही. कारखाने अवसायनात काढताना स्वतःच खरेदी करायचं हे ठरवून अवसायनात काढायचे हे सर्वच पक्षातील राज्यकर्त्याचे धोरण आहे. या पद्धतीने राज्यातील 42 कारखाने लिलावात निघाले 3 हजार कोटींचे कारखाने काही शेकडÎात विकले गेले 300 एकर जमिनीची किंमत 16 लाख दाखवली गेली यात जनतेचा पैसे लुटले गेले. सर्व पक्षिय नेत्यांनी शेतकऱयांच्या घरावर दरोडा घातला आहे. गेल्या काही वर्षा पासून यावर आम्ही पाठपुरावा करतोय मात्र आधीच्या सरकारने लक्ष घातल नाही. आताच सरकार ही लक्ष घालत नाही फडणवीस यांनी हे प्रकरण हसून घालवल असा आरोप शेट्टी यांनी केला.
तपास यंत्रणांचा राजकीय वापर
तपास यंत्रणांचा राजकीय वापर होत आहे असा आरोप शेट्टी यांनी केला ते म्हणाले, 2016 ला ईडी च्या दिल्ली कार्यलयात याबाबत पुरावे दिले 42 कारखाने विकले गेले यात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे. हे सर्व पक्षीय चोर आहेत मी कोणाला सॅटिफिकेट द्यायला आलो नाही. राजकीय हेतूने आता कारवाई केली जात आहे. अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, 42 कारखाने विकले गेले यात सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे हे सर्व पक्षीय चोर आहेत. मी कोणाला सॅटिफिकेट द्यायला आलो नाही राजकीय हेतूने आता कारवाई केली जात आहे. ईडी निष्पक्ष कारवाई करत आहे. असे म्हणता येईल, झोपलेली ईडी जागी झाली आहे. आता पुन्हा झोपे पर्यंत इतर कारखान्यांची यादी देणार आहे.
जनतेचा पैसे लुटले
पेट्रोल डिझेलची दरवाढ झाल्याचे कारण पुढे करुन दूध विक्री दरात वाढ केली जात आहे. यातून ग्राहकांना लुटण्याचाच उद्योग सुरु आहे. यातून मिळालेली एक दमडीही शेतकऱयांना मिळणार नाही. शेतकऱयांडून 25 ते 27 रुपयांनी दूध खरेदी केले जाते. विक्री मात्र मन मानेल त्या दराने होते. ही शेतकऱयांची फसवणूकच आहे. अशी टिका राजू शेट्टी यांनी केली.
दुधाला हमीभाव अशक्य
तात्कालीन दुग्ध विकास मंत्री महादेवराव जानकर यांनी गायीच्या दुधाला 27 रुपये हमीभाव दिला होता. मात्र कायद्याच्या कसोटीवर तो निर्णय टिकणारा नव्हता दूध जिवनावश्यक वस्तू असल्याने हमीभावाच्या कायद्यातून वगळण्यात आले आहे. केंद्र सरकारने सर्वच नाशवंत, अनाशवंत शेतीमाल हमीभावच्या यादीत समावेश केला तरच दुधालासुद्धा हमीभाव मिळू शकतो. यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.