प्रतिनिधी / पाटगांव
पाटगाव परिसरात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून पाटगाव मध्यम प्रकल्पाच्या मौनी सागर जलाशयातील पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे गेल्या 24 तासात पाटगाव परिसरात गेल्या चोवीस तासात सुमारे ११६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात आत्तापर्यंत ५० टक्के पाणीसाठा झाला आहे.
पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा समाधानी झाला असून यावर्षी भाताची लावण लवकर होणार आहे. तर काही ठिकाणी पुर सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले काही भागातील वाडयावस्त्यावरील वीजपुरवठा खंडीत झाल्याने दुर्गम भागातील लोकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. तर ओढे नाले दुथडी भरून वाहू लागल्याने वेदगंगा नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे.
अनेक ठिकाणी ओढ्याचे पाणी शेतात शिरलयाने शेतातील बांध वाहून गेले आहेत. मुसळधार पावसाने मौनी सागरजलाशयात गतवर्षीच्या तुलनेत ११% पाणीसाठा जास्त आहे. आज अखेर धरण परिसरात सुमारे दोन हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.