गेल्या चोवीस तासात २९० मि.मि. पाऊस, वादळी वाऱ्याने अथणी शुगर्स भुदरगड युनिट साखर कारखान्याचे जवळ-जवळ दोनशे पत्रे उडाले
पाटगांव/ प्रतिनिधी
पाटगाव परिसरात वादळी वाऱ्यासह धरणक्षेत्रात या वर्षाचा विक्रमी पाऊस झाला आहे .प्रचंड पावसामुळे भुदरगड तालुक्यातील वेदगंगा नदीवरील पाटगाव धरण आज सकाळपर्यंत ८८ %भरले आहे, गतवर्षी या तारखेस धरण शंभर टक्के भरले होते, गेल्या २४तासात सुमारे २९० मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाल्याने धरण क्षेत्रात या वर्षीचा विक्रमी पाऊस पडला आहे नदी काठच्या शेतामध्ये पाणी शिरल्याने भात पिकाच ही मोठं नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिसरात कांही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीज सेवा ठप्प झाली आहे कडगाव येथील प्रकाश देसाई , प्रवीण सुतार यांच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत.पाटगाव परिसरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या बरोबरच पाटगाव धरणाची पाणी पातळी वाढली आहे. जोराच्या वाऱ्यामुळे तांबळे येथील अथणी शुगर्स भुदरगड युनिट साखर कारखान्याचे जवळ-जवळ दोनशे पत्रे उडून गेले आहेत. या सर्वांचे पंचनामे करून नुकसंग्रस्ताना भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
या अगोदरच तालुक्यातील मेघोली कोंडोशी तीन लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत त्यामुळे या लघु प्रकल्पाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने वेदगंगा नदी च्या नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे त्यामुळे नदीकाठची ऊस आणि भात पिकांच पाण्यात बुडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यावर्षी जून पासून पडलेला पाऊस 4149 मिलिमीटर एवढा आहे तर गत वर्षी आज आखेर सुमारे 4500 मिलिमीटर पाऊस पडला होता. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास येत्या आठवड्याभरात पाटगांव धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागणार आहे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पाटगाव परिसरातील वाड्या-वस्त्या वर गेले चार दिवस विज नसल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.