राधानगरी / प्रतिनिधी
पाटबंधारे विभागाच्या विरोधास धुडकावून अखेर राजे समरजितसिंह घाटगे यांनी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या राधानगरी धरणस्थळावर शाहू महाराजांची १४७ वी जयंती बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातींच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत साजरी केली.
या जन्मोत्सव कार्यक्रमासाठी बीड, परभणी, अकलूज सांगलीसह इतर जिल्ह्यातून लोकं धरणस्थळावर उपस्थित होती. (पोलीस प्रशासनाने धरणस्थळावर जाण्यास रोकल्यानंतर शाहू प्रेमींनी ज्या शाहू महाराजांनी धरण उभारलं त्यांच्या वंशज्यासोबत महाराजांची जयंती साजरी करण्यास जाण्यास आम्हाला रोखता आम्ही काय अतिरेकी का देशद्रोही आहोत असं प्रतिउत्तर देत अडवणुकीस न जुमानता शाहू प्रेमी जनतेनं धरणस्थळावर प्रवेश केला.)
धरण बांधणी कामी ज्या बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीतील लोकांनी योगदान दिले आहे, त्यांच्या वंशज्यांच्या हस्ते धरणातील पाणी आणून होमहवन व धार्मिक विधी करीत शाहूंच्या पुतळ्यास जलाभिषेक आणि धार्मिक विधी केले.
यावेळी समरजितसिंह घाटगे यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्याने त्यांच्या कार्याची ओळख होत नाही , तर त्यांनी प्रत्यक्ष जे कार्य उभे केले आहे ते कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या कृतीच्या ठिकाणाहून म्हणजेच राधानगरी धरणावरच जयंती साजरी करण्याचा या परिसरातील लोकांचा आग्रह असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे, अठरापगड जातीचे लोक एकत्र येऊ नयेत हाच या कार्यक्रमास अडथळे निर्माण करणाऱ्यांचा उद्देश होता.
दरवर्षी या ठिकाणीच शाहू महाराजांची जयंती साजरी केली जाईल त्यातूनच राधानगरी पर्यटनाचा विकास होणार विरोध करणार्यांना बहुजन समाजचं उत्तर देईल.
यावेळी संभाजी आरडे,राहुल देसाई,राजवर्धन नाईक निंबाळकर, सुमित चौगले,दीपक शिरगावकर,मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्य समनव्यक शिवराज जोगदंड, विलास रणदिवे,दीपक मगर, सुहास निंबाळकर, प्रकाश चव्हाण यांच्यासह शाहूंप्रेमी उपस्थित होते.