केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाने काय महाग होणार नि काय स्वस्त होणार याबद्दलच्या बातम्या वाचण्यात सारे भारतवासी गढून गेले असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘वेटलॅण्ड दिन’ साजरा करण्यात आला. दरवषी 2 फेब्रुवारी रोजी ‘वर्ल्ड वेटलॅण्ड डे’ अर्थात ‘जागतिक पाणथळी दिवस’ पाळण्यात येत असतो. 30 ऑगस्ट 2021 रोजी ‘संयुक्त राष्ट्र संघटने’च्या (युनो) च्या आमसभेत झालेल्या ठरावानुसार 2 फेब्रुवारी रोजी या वर्षातील हा दिवस पाळण्यात आला. ‘वेटलॅण्डस ऍक्शन फॉर पीपल अँड नेचर’ (मानव आणि निसर्गासाठी पाणथळी जगवा) असे त्याचे घोषवाक्मय ठरविण्यात आले.
‘वेटलॅण्ड’ म्हणजे पाण्याने आच्छादलेले किंवा पृ÷भागावर अथवा निकट पाण्याचे अस्तित्व असलेले भूप्रदेश अशी सामान्यतः जगभर मान्य झालेली व्याख्या आहे. पर्यावरण पत्रकारिता या विषयावर व्यापक लेखन करणारे संतोष शिंत्रे यांनी ‘वेटलॅण्ड’ या शब्दाला ‘पाणथळी’ हा शब्द वापरला आहे, तोच येथे वापरू. संपूर्ण जगात अशी 2414 ‘पाणथळी’ स्थळे आहेत. संपूर्ण जगातील एकूण 254,540,512 हेक्टर जमीन त्यांनी व्यापली आहे. हा साडेपंचवीस कोटी हेक्टरचा आकडा मोठा दिसत असला तरी पृथ्वीवरील एकूण जमिनीच्या तो फक्त सहा टक्के आहे, आणि अशा स्थळांचे प्रमाण झपाटय़ाने कमी होत आहे.
हे ‘वर्ल्ड वेटलॅण्ड डे’ अर्थात ‘जागतिक पाणथळी दिना’चे काय प्रकरण आहे आणि त्याला एवढे महत्त्व का दिले जात आहे असा विचारही एखाद्याच्या मनात आला असेल तर बरेच, कारण त्यामुळे या विषयाकडे किती गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे ते तरी स्पष्टपणे लक्षात येईल. त्यासाठी प्रथम ‘पाणथळी’ म्हणजे काय ते व्याख्येच्या पलीकडे जाऊन पाहावे लागेल.
पृथ्वीचा अवघा सहा टक्के पृ÷भाग व्यापणाऱया या पाणथळ भूप्रदेशात एकूण वनस्पती आणि सजीव प्राण्यांच्या 40 टक्के म्हणजे जवळजवळ 1 लाख 40 हजार सजीव जगतात. नुसत्या माशांचा विचार केला तर एवढय़ाशा प्रदेशात जगातील 55 टक्के मासळी जगते. पृथ्वीवरील जैवसाखळीचे कार्य अखंडपणे चालण्यात या पाणथळी महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु अशा स्थळांचा झपाटय़ाने ऱहास होत आहे आणि म्हणूनच ‘जागतिक पाणथळी दिन’ महत्त्वाचा ठरतो.
‘युनो’च्या ‘पर्यावरण कार्यक्रमा’नुसार सन 1700 मध्ये जगात असणाऱया पाणथळीची संख्या सन 2000 पर्यंत 85 टक्क्मयांनी घसरली. इराणमधील रामसर या शहरात 1971 मध्ये एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्या परिषदेतील ठरावांच्या अंमलबजावणीस 1975 साली प्रारंभ झाला. ‘पृथ्वीच्या पाठीवर उपलब्ध असलेल्या पाण्याचे संवर्धन आणि विचारपूर्वक वापर करणे’ हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात असे घडले की या परिषदेनंतरच्या एकावन्न वर्षांत अशा स्थळांची संख्या 35 टक्क्मयांनी कमी झाली. हे घडण्याची जी कारणे ‘युनो’ने सांगितली आहेत ती बहुतेक मानवनिर्मित आहेत. रासायनिक शेती, बांधकामे, नाना प्रकारचे प्रदूषण, मच्छिमारीचा अतिरेक आणि नैसर्गिक संसाधनांची ओरबाडणूक ही महत्त्वाची कारणे आहेत. ‘युनो’च्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाच्या प्रमुख समन्वयक कुमारी लेटिसिया कार्व्हालो या कारणांना उपरोधिक स्वरात मानवजातीचे ‘उत्पादक’ उद्योग असे संबोधले आहे. अतोनात वृक्षतोड आणि उद्योगांकडून सोडले जाणारे अस्वच्छ (प्रदूषणकारक) पाणी या दोन कारणांमुळे तेथे राहणाऱया सजीव प्राण्यांचा अधिवास (राहती जागा) धोक्मयात येतो आणि विषारी पदार्थांमुळे त्यांच्या जीविताला थेट धोका निर्माण होतो. मासे नष्ट होतात आणि स्थलांतरित पक्ष्यांची संख्या कमी होते. कांदळवनांच्या जमिनींवर भराव टाकून वसाहती उभारण्याचा उद्योग म्हणजे तर पाणथळी प्रदेशांना मारक ठरणारा भयानक राक्षसच! सर्वात चिंताजनक बाब म्हणजे जमिनीवरील किंवा पाण्यातील सजीवांपेक्षा जास्त वेगाने पाणथळी प्रदेशातील सजीवांचा ऱहास होत आहे.
या पाणथळी जागांचा ऱहास झाला तर काय होईल ते जाणून घेणे गरजेचे आहे. या जागा सर्व प्रकारच्या सजीवांचा मुख्य जीवनाधार आहेत. पूरनियंत्रण, सांडपाणी प्रक्रिया, जलाशयातील अतिरिक्त गाळाचे प्रमाण कमी करणे आणि जलाशयांचे पुनर्भरण करणे ही महत्त्वाची कामे या प्रदेशांकडून निसर्गातः केले जाते. जैवविविधतेच्या अभ्यासासाठी ही स्थळे महत्त्वाची ठरतात आणि वॉटर स्पोर्ट्ससारख्या मनोरंजक कार्यातही उपयुक्त ठरतात. याखेरीज अतिवृष्टीच्या वेळी अतिरिक्त पाणी साठवण्याचे काम ही स्थळे करतात, येथील वनस्पतींमुळे जमिनीची धूप रोखली जाते आणि किनाऱयावरील लाटांची मर्यादा राखून वादळापासून होणारा धोका कमी करतात. हे रोखण्यासाठी आणि पूर्वस्थितीत परत जाण्यासाठी 2015 मध्ये 2030 पर्यंतचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. ‘बाल्टिक प्रोजेक्ट’ नांवाचा एक पथदर्शी प्रकल्प अलीकडे हाती घेण्यात आला. खतांचा अतिवापर आणि सातत्याने पिके घेण्याने जमिनीतील पोषक द्रव्यांचा नाश झाला हे ध्यानात घेऊन 117 ठिकाणी शेतीच्या पद्धती बदलण्याचा प्रयोग केला. असे प्रयोग जागोजागी होणे गरजेचे आहे.
‘पाणथळी’ प्रदेशांच्या ऱहासाबद्दल भारतीयांनी सजग होण्याची गरज अधोरेखित करणारी काही आकडेवारी येथे देणे उद्बोधक होईल. जगात 2414 पाणथळी प्रदेश आहेत आणि भारतात जेमतेम पस्तीस आहेत, संख्येनुसार भारतात असे फक्त 1.53 टक्के प्रदेश आहेत. त्यांची क्षेत्रफळानुसार व्याप्ती पाहता ती 1 लाख 68 हजार हेक्टर आहे, टक्केवारीच्या हिशेबात ती अवघी 0.42 टक्के एवढीच भरते. जगाची 2.2टक्के भूमी व्यापणाऱया भारतात पाणथळी इतक्मया कमी प्रमाणात आहेत. त्यातही या पस्तीसपैकी महाराष्ट्रात लोणार हा एकमेव प्रदेश आहे.
अलीकडे वाहतुकीचे विद्युतीकरण करण्याच्या प्रक्रियेने जगभर जोर धरला आहे. विद्युत वाहनांच्या बॅटऱया बनविण्यासाठी आवश्यक असणारा कोबाल्ट हा धातू मिळविण्याच्या प्रक्रियेत जमिनीच्या पृ÷भागावर प्रचंड कोरडेपणा येण्याचा धोका निर्माण झाला आहे. ‘पाणथळी वाचवा’ हे घोषवाक्मय गंभीरपणे विचारात घेतले नाही आणि कृतीत उतरवले नाही तर ऱहास अटळ आहे.
-राजेंद्रप्रसाद स. मसुरकर