नदीकाठच्या नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास : कल्लोळ बंधाऱयावर कचऱयाचे ढीग साचल्याने वाहतूक बंदच, कचरा उचलण्याची गरज
वार्ताहर / एकसंबा
पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण घटल्याने चिकोडी तालुक्मयातील बंधाऱयांवर आलेले पाणी पूर्णपणे ओसरले आहे. पाणलोट क्षेत्रासह तालुक्मयात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पाणीपातळीत मोठी घट झाल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दूधगंगा नदीवरील मलिकवाड- दत्तवाड व कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर बंधारा खुला झाला आहे. पण कल्लोळ बंधाऱयावर पुराच्या पाण्यातून वाहून आलेला कचरा मोठय़ा प्रमाणावर साचल्याने वाहतूक बंदच आहे.
गेल्या आठवडय़ात महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी तालुक्मयातील दोन बंधारे पाण्याखाली गेले होते. याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. सध्या पाऊस ओसरल्याने महाराष्ट्रातून येणाऱया पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे तालुक्मयातील दूधगंगा व कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. सध्या कृष्णा नदीची पाण्याची पातळी 527.91 मीटर, दूधगंगा नदीची पाणीपातळीत 531. 03 मीटर आहे. कृष्णा व दूधगंगा नदीचे पात्र धोका पातळीपर्यंत आले होते. यामुळे नदीकाठी वाढत्या पाणीपातळीमुळे धास्ती वाढली होती. पण पाऊस ओसरल्याने पाणीपातळीत घट होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
दि. 24 रोजी सकाळपर्यंत राजापूर बंधाऱयातून 38750 क्मयुसेक, दूधगंगा नदीतून 7060 क्मयुसेक असे एकूण 45810 क्मयुसेक्स विसर्ग कल्लोळ कृष्णा नदीतून होत आहे. पावसाचे प्रमाण पाहता कोयना 16 मि. मी, वारणा 4 मि. मी, नवजा 22 मि. मी, राधानगरी 25 मि. मी, महाबळेश्वर 40 मि. मी, पाटगाव 40 मि. मी, पावसाची नोंद झाली आहे. तर चिकोडी तालुक्मयातील चिकोडी, सदलगा, अंकली, जोडट्टी, नागरमुन्नोळी या पर्जन्यमापन केंद्रावर 0 मि. मी पाऊस झाला आहे. पण गेल्या आठवडय़ात झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
जलाशयातील पाणी पातळीत वाढ
मध्यंतरीच्या पावसामुळे कोयना 41.45 टीएमसी, वारणा 18.30 टीएमसी, राधानगरी 3.13 टीएमसी, काळम्मावाडी 9.82 टीएमसी, कन्हेर 4.7 टीएमसी, धोम 5.85 टीएमसी, पाटगाव 1.76 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर आलमट्टी जलाशयात 88.758 टीएमसी पाणीसाठा असून 58537 क्मयुसेक आवक होत आहे. तर 37415 क्मयुसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.