प्रतिनिधी /पणजी
भाटले-पणजी येथील अडवलपालकर पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून पाणी नसल्याच्या निषेधार्थ या निवासी इमारतीतील नागरिकांनी आज पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला.
गेल्या सहा महिन्यांपासून पाणी मिळत नसल्याने या निवासी इमारतीतील रहिवाशांचे पाण्याविना हाल होत आहेत. यासंबंधी अनकदा विनंती अर्ज करूनही तयाकडे दुर्लक्ष केले गेले. आज रहिवाशांनी पाणीपुरवठा खात्याच्या अभियंत्यांना घेराव घातल्यानंतर त्यांनी या प्रकरणी चौकशी करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.