गोव्यातील पहिल्याच प्रयोगाची चाचपणी सुरू.
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयामध्ये वेगवेगळय़ा गावात पिण्याच्या पाण्याची समस्या सातत्याने भेडसावत असते. यामुळे पाणीपुरवठा कार्यालयाला अनेक स्तरावर मोर्चा व घेरावाना सामोरे जावे लागत असते. यामुळे पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱयांची डोकेदुखी मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसत आहे. सत्तरी तालुक्मयातील जमीन भौगोलिकदृष्टय़ा असमांतर असल्यामुळे उंच ठिकाणी असलेल्या भागांना अनेकवेळा पाणीपुरवठय़ाची टंचाई निर्माण होत असतो तर त्याच गावातील खालच्या भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत असतो. याचा सारासार विचार करून व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाळपई पाणीपुरवठा कार्यालयाने एक तंत्राची व्यवस्था केली असून त्याचा वापर सध्या प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेला आहे. सध्यातरी सदर तंत्रामुळे खालच्या भागांना मुबलक प्रमाणात होणारा पाण्याचा पुरवठा हा नियंत्रित स्वरूपाचा होत असतो व यामुळे उंच भागावर समाधानकारक पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयात उंच ठिकाणी असलेल्या घरांना समाधानकारक पाणीपुरवठा होणार याकडे या अधिकाऱयांचे लक्ष लागणार आहे.
सदर यंत्र खरोखरच परिणामकारक ठरल्यास अनेकस्तरावर त्याचा चांगल्या प्रकारे फायदा उंच ठिकाणी असलेल्या नळांना होणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केलेले आहे.
खालच्या घरांना सदर यंत्राचा वापर.
दरम्यान याबाबत वाळपई पाणीपुरवठा कार्यालयाचे अधिकारी सोमा नाईक विराज पाटील, गणेश गावकर, योगेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्यातरी हिवरे ,चरावणे, गोळवली आदी भागातील सुमारे चारशे घरांना या संदर्भात प्रायोगिक तत्त्वावर तपासणी करण्यात येत आहे. या गावांमध्ये उंच ठिकाणी असलेल्या घराला पाणीपुरवठा होत नव्हता. मात्र त्याच भागातील खालच्या घरांना 24 तास पाणीपुरवठा उपलब्ध होत होता. यामुळे उंच ठिकाणी असलेल्या नागरिकांची वारंवारपणे पाणी टंचाई संदर्भात तक्रार कार्यालयामध्ये येत होती. यामुळे सदर यंत्राचा वापर खालच्या ठिकाणी असलेल्या घरांना करण्यात आलेला आहे. त्यांच्या नळाना सदर यंत्र बसविल्यानंतर आवश्यक स्वरूपाचाच पाणीपुरवठा नळांच्या माध्यमातून होत असतो .यामुळे पाण्याची मोठय़ा प्रमाणात बचत होऊन याच पाण्याचा प्रेशर उंचठिकाणी असलेल्या घरांना प्राप्त होत असतो. यामुळे उंच घराना मिळत नसलेला पाणीपुरवठा नियंत्रित स्वरूपाचा प्राप्त होत असतो यामुळे मोठय़ा प्रमाणात येणाऱया तक्रारी सध्यातरी बऱयाच प्रमाणात कमी झाल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केलेले आहे.
गोव्यात पहिल्यांदाच वापर.
अशा तंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न गोव्यामध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे. यामुळे येणाऱया काळात खालच्या भागामध्ये असलेल्या घरांना याचा वापर करून पाणी टंचाईवर मात करण्याचे तंत्र पाणी पुरवठा कार्यालय विकसित करणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केलेले आहे. सत्तरी तालुक्मयात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या तंत्राचा वापर करण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे या यंत्राची किंमत फक्त चारशेच्या आसपास असून यामुळे मात्र पाणीपुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱयांना मोठय़ा प्रमाणात निर्माण झालेली डोकेदुखी बऱयाच प्रमाणात कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.