ऑनलाईन टीम / पुणे :
हिंजवडी येथील खाजगी कंपन्यांमध्ये पाणी पुरवण्याच्या वादातून तिघांनी एका तरुणावर तलवारीने वार करत खुनी हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. 18) सायंकाळी सातच्या सुमारास हिंजवडी फेज दोन येथे घडली.
गोरख राजाराम ओझरकर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल ओझरकर, राहुल ओझरकर, योगेश ओझरकर (सर्व रा. माण ओझरकरवाडी, ता. मुळशी) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ राजाराम ओझरकर (वय 39, रा. माण ओझरकरवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील कंपनीत विकत पाणी पुरविण्याच्या वादातून आरोपींनी फिर्यादी नवनात यांचे भाऊ गोरख यांच्यावर तलवारीने वार करून खुनी हल्ला केला. या हल्ल्यात गोरख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.